Navi Mumbai news : ऐरोलीत जोरदार पावसामुळे ४० फूट लोखंडी कमान कोसळली!

सुदैवाने जीवितहानी नाही


मुंबई : जोरदार पावसामुळे (Heavy rainfall) सध्या मुंबईकरांची (Mumbaikars) फारच तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) देखील पावसाने जोर धरला आहे. मात्र, त्यामुळे एक दुर्घटना घडली. ऐरोलीत (Airoli) अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फूट लोखंडी कमान कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ३ च्या रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. पावसाचा जोर वाढल्यामुळे ऐरोलीच्या भारत बिजली येथील रेल्वे रुळागत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी कमान कोसळली. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.


ही कमान रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना ताबडतोब संपर्क साधण्यात आला. रस्त्यावर कोसळलेली कमान ही हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कमान हटवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. रस्त्यावर कमान कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. आता या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात