Monsoon 2024 : पेरणीची घाई न करण्याचा हवामान तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना सल्ला

काय आहे कारण?


नागपूर : राज्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण (Monsoon 2024) आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणार्‍या नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पोहोचलेला नाही. अशी परिस्थिती असताना हवामान तज्ज्ञांनी (Meteorologists) शेतकर्‍यांना (Farmers) एक मोलाचा सल्ला दिल्ला आहे. शेतकर्‍यांनी पेरणीची (Sowing) घाई करु नये, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


मान्सूनचे आमगन झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला आणि पेरण्यांना सुरूवात केली. मात्र काही ठिकाणी पाऊस न पोहोचल्यामुळे या भागातील शेतकरी अद्याप मान्सूची प्रतीक्षा करत आहेत. अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती दिली आहे.


विदर्भातील मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणतः १५ जून असली तरी यंदा चार दिवस आधीच पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. तर दुसरीकडे पूर्व विदर्भामध्ये मान्सून सुरू झाला नाही त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी मान्सूची अजूनही प्रतीक्षा करत आहेत.


पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. जोपर्यंत पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत समाधानकारक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा