Onion price hike : कांद्याने पुन्हा रडवलं, गृहिणींचं बजेट कोलमडलं!

फक्त १५ दिवसांत कांद्याच्या दरात ३० ते ५० टक्क्यांनी वाढ!


मुंबई : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडल्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये तसेच भाजीपाल्याच्या दरात घट होईल, अशी आशा होती. मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. कांद्याने पुन्हा सामान्य माणसावर रडायची वेळ आणली असून कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे गृहिणींचं बजेटही कोलमडलं आहे. मागील १५ दिवसांमध्ये कांद्याचे भाव ३० ते ५० टक्क्यांनी वाढले असल्याचं (Onion Price Hike 30 To 50 Percent) समोर आलं आहे.


काही दिवसांपूर्वी बटाट्याच्या किंमती वाढल्या होत्या. आता कांदा महागला आहे. सध्या देशात कांद्याची आवक कमी होत आहे, तर मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारात येणारा कांदा हा साठ्याचा आहे. २०२३-२४ मध्ये रब्बी पिकामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. त्यानंतर कांद्याचा दर वाढण्याचा अंदाज त्यांना आहे. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळेच शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत.


निर्यात शुल्क सध्या ४० टक्के असल्यामुळे कांद्याची निर्यात कमी होत आहे. सरकारने निर्यात शुल्क हटवल्यास कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी कांदा साठवून ठेवले असल्याची माहिती हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली आहे. केंद्र सरकारने आता कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेणं अपेक्षित आहे.



कांद्याच्या सरासरी घाऊक किमतीत मोठी वाढ


नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये कांद्याच्या सरासरी घाऊक किमतीत मोठी वाढ झाली आहे. १० जून रोजी सरासरी घाऊक दर प्रतिकिलो २६ रुपये होता. मागील महिन्यात २५ तारखेला हा दर प्रतिकिलो १७ रुपये होता. राज्यातील अनेक घाऊक बाजारात कांद्याचे दर ३० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास