Yavatmal crime : शेतकरी कुटुंबाची तब्बल ३० लाखांची रोकड आणि २० तोळे सोनं लुटलं!

यवतमाळमध्ये सर्वात मोठा सशस्त्र दरोडा


यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरोडेखोरांनी एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३० लाखांची रोकड आणि २० तोळे सोनं लुटल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या महागांव तालुक्यातील (Mahagaon Taluka) चिल्ली ईजारा (Chilli Ijara) येथील जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा (Armed robbery) टाकण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागांव तालुक्यातील सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबातील संतोष पांडे हे शेतकरी असून महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात गेल्या ६० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. जंगलात त्यांचा एक मोठा वाडा आहे. तसेच त्यांची वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पांडे कुटुंबाने कापूस विकला होता. कापूस विकून मिळालेली रक्कम आणि घरातील सोनं असा ऐवज पांडे कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवण्यात आला होता.


रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६ दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या साहाय्यानं वाड्यात घुसले. संतोष कुमार पांडे यांच्या सोबत त्यांची बहीण कु. कृष्णा मनोहर पांडे (३५) आणि सौ. सविता सुभाष तिवारी (४९) रा. नागपूर, ह्या काल रात्री घरात मुक्कामी होत्या. दरोडेखोरांनी सर्वात आधी संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली. बंदूक आणि त्यानंतर तलवारीच्या धाकावर दरोडेखोरांनी घराची झाडाझडती घेत ३० लाखांवर रोख रक्कम आणि १७० ग्राम सोन्यांचे दागिने असा ३८ लाख ५० हजाराचा ऐवज लुटून नेला. यात संतोष पांडे यांची बहीण करिष्मा पांडे, सविता तिवारी यांना जबर मारहाण करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे कुटुंबियांच्या घरावर ज्या दरोडेखोरांनी दरोडा घातला, ते सर्व दरोडेखोर हिंदी आणि मराठीत बोलत होते, अशी माहिती पीडित कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकाराची तक्रार पांडे कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्थानकात दिली.



पोलिसांचा तपास सुरु


घटनेचं गांभीर्य ओळखून महागावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव याप्रकरणी कसून तपास करत आहेत. पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस आधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यासह डॉग युनिट, फिंगर प्रिंट यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Comments
Add Comment

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा