Jalna news : घरकुल योजनेत घर न मिळाल्याने जालन्यात तीन तरुणांचे धक्कादायक कृत्य!

हातात डिझेलच्या बॉटल्स घेऊन जिल्हा परिषदेसमोरच केलं असं काही...


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जालना (Jalna news) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यातच आज जालन्यात घडलेल्या एका धक्कादायक कृतीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रमाई आवास घरकुल योजनेत (Ramai Awas gharkul yojana) घर न मिळाल्यामुळे तीन तरुणांनी जालना जिल्हा परिषदेसमोरच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना अडवल्यामुळे अनुचित प्रकार होता होता टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील या तरुणांनी हातात डिझेलच्या बॉटल्स आणि ज्वलनशील पदार्थ आणले होते. ते त्यांनी स्वतःच्या डोक्यावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणांच्या हातातील बॉटल्स हिसकावून घेत त्यांना अडवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव गावातील ३२ जणांना रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळाले आहे. मात्र, या तीन तरुणांना ते मिळालेले नाही. त्यांनी आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला.



युवक काय म्हणाले?


झाल्या प्रकाराबाबत संतप्त होत तरुणांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चार वर्षे झाली, तेव्हापासून अर्ज भरत आहोत. दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल, असं सांगितलं जातं. आम्ही उसतोडी करतो. यावेळी ३२ जणांना लाभ मिळाला आहे. अनेक जणांना दोन-दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे. आम्हाला गेल्या ४ वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या युवकांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

Jejuri Accdent : जेजुरी दुर्घटनेनंतर वारीत आणखी एक अपघात; अहिल्यानगरात भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले

पुणे : पुण्यातील जेजुरीजवळ (Jejuri) ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेल्या भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच वारीत