Jalna news : घरकुल योजनेत घर न मिळाल्याने जालन्यात तीन तरुणांचे धक्कादायक कृत्य!

हातात डिझेलच्या बॉटल्स घेऊन जिल्हा परिषदेसमोरच केलं असं काही...


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जालना (Jalna news) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यातच आज जालन्यात घडलेल्या एका धक्कादायक कृतीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रमाई आवास घरकुल योजनेत (Ramai Awas gharkul yojana) घर न मिळाल्यामुळे तीन तरुणांनी जालना जिल्हा परिषदेसमोरच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना अडवल्यामुळे अनुचित प्रकार होता होता टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील या तरुणांनी हातात डिझेलच्या बॉटल्स आणि ज्वलनशील पदार्थ आणले होते. ते त्यांनी स्वतःच्या डोक्यावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणांच्या हातातील बॉटल्स हिसकावून घेत त्यांना अडवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव गावातील ३२ जणांना रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळाले आहे. मात्र, या तीन तरुणांना ते मिळालेले नाही. त्यांनी आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला.



युवक काय म्हणाले?


झाल्या प्रकाराबाबत संतप्त होत तरुणांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चार वर्षे झाली, तेव्हापासून अर्ज भरत आहोत. दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल, असं सांगितलं जातं. आम्ही उसतोडी करतो. यावेळी ३२ जणांना लाभ मिळाला आहे. अनेक जणांना दोन-दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे. आम्हाला गेल्या ४ वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या युवकांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले