सर आली धावून पुल गेला वाहून!

पुलाच्या कामाच्या चौकशीची मागणी


पुणे : दौंड तालुक्यात नव्याने बांधकाम सुरु असलेल्या भीमा नदीवरील (Bhima River Bridge) पुलाचे खांब पहिल्याच पावसात कोसळल्याने या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


दौंड (Daund) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. २० कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होते. मात्र पूल उभारण्याचे काम सुरू असताना काल रात्री झालेल्या पावसात नदीला पूर आल्याने पुलाचे खांब कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि धरणातून देखील थोडे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नदीला पूर आला होता. यावेळी येथील पिलरचा एक भाग कोसळला. त्यामुळे या कामाची पात्रता किती निकृष्ट दर्जाची होती हे यावरून सिद्ध होते. जर दिवसा काम सुरू असताना हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.


या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या पुलासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे भूमीपूजन २०२१ साली झाले. या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. तसेच पुलाचे काम करताना सतत अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळल्याचे स्थानिक म्हणत आहेत.


याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा पडला नसून याचा काही भाग वाकडा झाला होता. त्यामुळे आम्ही तो काढायला सांगितला असे म्हणून आपली चूक झाकणाच्या प्रयत्न बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.


दरम्यान, भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील कोणतीही माहिती देत नाही, असा आरोप देखील होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत