नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा (NDA Government) काल शपथविधी सोहळा पार पडला. नव्या मंत्रिमडळाने यात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यात पहिल्यांदाच केरळमधून निवडून आलेले भाजपा खासदार सुरेश गोपी (Kerala BJP MP Suresh Gopi) यांचाही समावेश होता. मात्र, काल शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या काही माध्यमांतून प्रसारित करण्यात आल्या. यावर सुरेश गोपी यांनी स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.
सुरेश गोपी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटले आहे की, ‘मी मोदी सरकारच्या मंत्रिपरिषदेचा राजीनामा देणार असल्याची चुकीची बातमी काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरवत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत.’ त्यांच्या या ट्वीटमुळे ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
माध्यमांमध्ये बातमी पसरवण्यात आली की शपथविधीनंतर दिल्लीच्या एका प्रादेशिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना सुरेश गोपी यांनी मंत्रीपद नको असल्याची इच्छा बोलून दाखवली. आपण या मंत्रीपदाची मागणी भाजपाकडे केली नव्हती, त्यामुळे मोदीजींनी मला यातून मुक्त करावं, असं सुरेश गोपी म्हणाल्याचा दावा माध्यमांनी केला. सुरेश गोपी हे प्रथम एक अभिनेते आहेत, त्यांनी काही फिल्म्स साईन केल्या आहेत, त्यांना त्या फिल्म्स सोडणं जमणार नाही, त्यामुळे मंत्रीपद नको, अशा चर्चा माध्यमांतून रंगल्या होत्या.
दरम्यान सुरेश गोपी हे केरळमधील भाजपचे पहिले खासदार आहेत. त्यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सीपीआयचे सुनील कुमार यांचा सुमारे ७५ हजार मतांनी त्यांनी पराभव केला. लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारादरम्यान अभिनेता ते खासदार झालेले सुरेश गोपींनी त्रिशूरसाठी एक केंद्रीय मंत्री, मोदीची गॅरंटी या घोषणेवर निवडणुकीचा प्रचार केला होता.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…