PM Narendra Modi : पंतप्रधान म्हणून तिसर्‍या कार्यकाळात नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकर्‍यांसाठी!

पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल पंतप्रधानपदाची (Prime ministership) शपथ घेतली आणि ते तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर त्यांनी अजिबात विश्रांती न घेता लगेच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय हा देशातील शेतकर्‍यांच्या (Farmers) हिताचा आहे.


नरेंद्र मोदी यांनी आज अधिकृतपणे आपल्या कार्यालयात जाऊन पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला. यावेळी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा (PM Kisan nidhi) १७ वा हप्ता जारी केला.


लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेले अनेक दिवस आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्यामुळे पंतप्रधान किसान निधीमार्फत जो निधी शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा होतो, तो दिला गेला नव्हता. त्यामुळे मोदींनी तिसर्‍या कार्यकाळात पहिली सही पीएम किसान निधीच्या फाईलवर केली आहे. ज्यामुळे हा निधी सगळ्या शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचणार आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव