IND vs PAK: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन, भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेले होते न्यूयॉर्कला

  113

मुंबई: क्रिकेट जगतासाठी दुख:दायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्यासोबत एमसीएचे अजिंक्य नायक आणि एपेक्स काऊंसिल मेंबर सूरज समतही उपस्थित होते.


अमोल काळे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अमोल हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळचे संबंध होते.



अमोल काळे यांचे मोठे निर्णय


अमोल काळे यांना २०२२मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे स्टेडियमने यशस्वीपणे २०२३चा वनडे क्रिकेट वर्ल्डकपचा शेवटचा सामना आयोजित केला होता. इतकंच नव्हे तर अंडर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही मुंबईच्या संघाने यश मिळवले होते. नुकतेच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या हंगामात फायनलमध्ये विदर्भला १६९ धावांनी हरवत ट्रॉफी जिंकली होती. अमोल यांच्या नेतृत्वातच डोमेस्टिक खेळाडूंचा पगार डबल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळाही उभारला होता. अमोल काळे अनकदा लाल बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यााबाबत बोलत असतं. त्यांनी मुंबईच्या संघाला रणजी चॅम्पियन बनल्यानंतर ५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले होते. ते मूळचे नागपूरचे होते. एक दशकापूर्वी ते मुंबईला शिफ्ट झाले होते.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र