IND vs PAK: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन, भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेले होते न्यूयॉर्कला

  108

मुंबई: क्रिकेट जगतासाठी दुख:दायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्यासोबत एमसीएचे अजिंक्य नायक आणि एपेक्स काऊंसिल मेंबर सूरज समतही उपस्थित होते.


अमोल काळे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अमोल हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळचे संबंध होते.



अमोल काळे यांचे मोठे निर्णय


अमोल काळे यांना २०२२मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे स्टेडियमने यशस्वीपणे २०२३चा वनडे क्रिकेट वर्ल्डकपचा शेवटचा सामना आयोजित केला होता. इतकंच नव्हे तर अंडर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही मुंबईच्या संघाने यश मिळवले होते. नुकतेच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या हंगामात फायनलमध्ये विदर्भला १६९ धावांनी हरवत ट्रॉफी जिंकली होती. अमोल यांच्या नेतृत्वातच डोमेस्टिक खेळाडूंचा पगार डबल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळाही उभारला होता. अमोल काळे अनकदा लाल बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यााबाबत बोलत असतं. त्यांनी मुंबईच्या संघाला रणजी चॅम्पियन बनल्यानंतर ५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले होते. ते मूळचे नागपूरचे होते. एक दशकापूर्वी ते मुंबईला शिफ्ट झाले होते.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार