IND vs PAK: MCA अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन, भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेले होते न्यूयॉर्कला

  116

मुंबई: क्रिकेट जगतासाठी दुख:दायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांच्यासोबत एमसीएचे अजिंक्य नायक आणि एपेक्स काऊंसिल मेंबर सूरज समतही उपस्थित होते.


अमोल काळे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अमोल हे मूळचे नागपूरचे होते. त्यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळचे संबंध होते.



अमोल काळे यांचे मोठे निर्णय


अमोल काळे यांना २०२२मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली वानखेडे स्टेडियमने यशस्वीपणे २०२३चा वनडे क्रिकेट वर्ल्डकपचा शेवटचा सामना आयोजित केला होता. इतकंच नव्हे तर अंडर डोमेस्टिक क्रिकेटमध्येही मुंबईच्या संघाने यश मिळवले होते. नुकतेच मुंबईने रणजी ट्रॉफी २०२३-२४च्या हंगामात फायनलमध्ये विदर्भला १६९ धावांनी हरवत ट्रॉफी जिंकली होती. अमोल यांच्या नेतृत्वातच डोमेस्टिक खेळाडूंचा पगार डबल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळाही उभारला होता. अमोल काळे अनकदा लाल बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यााबाबत बोलत असतं. त्यांनी मुंबईच्या संघाला रणजी चॅम्पियन बनल्यानंतर ५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले होते. ते मूळचे नागपूरचे होते. एक दशकापूर्वी ते मुंबईला शिफ्ट झाले होते.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे