IND vs PAK: भारताने पाकिस्तानच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास, रोमहर्षक सामन्यात ६ धावांनी विजय

न्यूयॉर्क: न्यूयॉर्कच्या नसाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय गोलंदाजांनी जादुई कामगिरी करताना टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध ६ धावांनी विजय मिळवून दिला. टॉस हरवल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित ब्रिगेडला केवळ ११९ धावा करता आल्या होत्या.


प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानची धावसंख्या एक काळ १३व्या षटकापर्यंत २ बाद ७३ इतकी होती. यावेळी पाकिस्तान सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी बाजी परतून लावली. १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला केवळ ११३ धावाच करता आल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने ३ आणि हार्दिक पांड्याने २ विकेट मिळवल्या.


सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. बुमराहने ४ षटकांत १३ धावा देत तीन विकेट मिळवल्या. तर हार्दिक पांड्याने फखर जमां आणि शादाब खान यांना बाद करत कमबॅक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंह आणि अक्षऱ पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळवलाय अर्शदीपने सामन्याती शेवटची ओव्हर टाकली होती. यात पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या.


याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात चांगली झाली नव्हती. दुसऱ्याच षटकांत विराट कोहलीची विकेट गमावली होती. कोहली ४ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर रोहित आफ्रिदीच्या बॉलवर आऊट झाला. यानंतर अक्षर पटेल आणि पंतने तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची सर्वाधिक भागीदारी केली. मात्र पटेल मोठा शॉट मारण्याच्या नादात बोल्ड झाला.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल