पाणी हेच जीवन : कविता आणि काव्यकोडी

पाणी आहे म्हणून तर
सृष्टी झाली निर्माण
पाण्यामुळेच चराचरात
फुलले पंचप्राण


पाणी पिऊन हुशार होऊन
हसले पान न् पान
झाडेवेली बहरून गेली
डोलू लागले रान


पाण्यामुळेच सुखावतो
ओसाड उजाड माळ
पाण्यामुळेच आपला
सुरक्षित भविष्यकाळ


पाण्याअभावी जीवानाचे
होई वैराण वाळवंट
डोळ्यांत दाटते पाणी
आणि शुष्क होई कंठ


म्हणूनच पाणी नुसतं
आपल्यासाठी नाही द्रव्य
पृथ्वीचं स्पंदन ते
आपल्यासाठी अमृततुल्य


पाणी देते प्राणिमात्रांच्या
जीवास जीवनदान
म्हणूनच पाणी जपण्याचे
करूया सर्वश्रेष्ठ काम



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) लहान मोठ्या साऱ्यांची
भाषा त्याला येई
गाणी, गोष्टी आणखी
सांगे बरेच काही


कपाटात बसायला
नाही त्याला आवडत
ज्ञानाचा खजिना
पानांत कोण दडवत?


२) उन्हात उभे राहून
सावलीत साऱ्यांना घेतात
शुद्ध प्राणवायूही
भरभरून देतात


पर्यावरणाचा समतोल
राखतात किती छान
सांगा मुलं कोणाची
फळ, फूल, पान?


३) सागर काठांवर
असे यांची दाटी
ओल्या, सुक्यांची
होते मग वाटी


भाजीत घालतात
करंजीत भरतात
देवापुढे कोणाची
शेंडी बर धरतात?



उत्तर -


१)पुस्तक


२) झाड


३) नारळ

Comments
Add Comment

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील रोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ

आत्महत्या

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ माझ्या लहानपणी मला माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट कायमची मनावर कोरली गेली आहे.

अवगुणांमुळे प्रतिष्ठा जाते

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात गुण आणि अवगुण हे दोन्ही असतात. गुण माणसाला उंचावतात, तर

आकाश निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोघी बहिणी. त्यांना जसा अभ्यासात रस होता तशीच त्यांना वाचनाचीही भारी आवड

खरे सौंदर्य

कथा : रमेश तांबे एक होता राजा. त्याचे राज्य खूप मोठे होते. त्याच्या राज्यातले लोक आनंदी आणि समाधानी होते. राजाने