पाणी हेच जीवन : कविता आणि काव्यकोडी

पाणी आहे म्हणून तर
सृष्टी झाली निर्माण
पाण्यामुळेच चराचरात
फुलले पंचप्राण


पाणी पिऊन हुशार होऊन
हसले पान न् पान
झाडेवेली बहरून गेली
डोलू लागले रान


पाण्यामुळेच सुखावतो
ओसाड उजाड माळ
पाण्यामुळेच आपला
सुरक्षित भविष्यकाळ


पाण्याअभावी जीवानाचे
होई वैराण वाळवंट
डोळ्यांत दाटते पाणी
आणि शुष्क होई कंठ


म्हणूनच पाणी नुसतं
आपल्यासाठी नाही द्रव्य
पृथ्वीचं स्पंदन ते
आपल्यासाठी अमृततुल्य


पाणी देते प्राणिमात्रांच्या
जीवास जीवनदान
म्हणूनच पाणी जपण्याचे
करूया सर्वश्रेष्ठ काम



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) लहान मोठ्या साऱ्यांची
भाषा त्याला येई
गाणी, गोष्टी आणखी
सांगे बरेच काही


कपाटात बसायला
नाही त्याला आवडत
ज्ञानाचा खजिना
पानांत कोण दडवत?


२) उन्हात उभे राहून
सावलीत साऱ्यांना घेतात
शुद्ध प्राणवायूही
भरभरून देतात


पर्यावरणाचा समतोल
राखतात किती छान
सांगा मुलं कोणाची
फळ, फूल, पान?


३) सागर काठांवर
असे यांची दाटी
ओल्या, सुक्यांची
होते मग वाटी


भाजीत घालतात
करंजीत भरतात
देवापुढे कोणाची
शेंडी बर धरतात?



उत्तर -


१)पुस्तक


२) झाड


३) नारळ

Comments
Add Comment

इच्छेला प्रयत्नांची जोड हवीच

शिल्पा अष्टमकर: गोष्ट लहान, अर्थ महान माणसाच्या जीवनात इच्छा असणे ही पहिली पायरी आहे, पण केवळ इच्छा असून चालत

संस्कारक्षम मन

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ शाळेचे अनेक उपक्रम असतात. अशाच एका उपक्रमात शाळेतल्या विद्यार्थ्यांना

चिंगी मुंगी...

कथा: रमेश तांबे एक होती मुंगी नाव तिचं चिंगी एकदा काय झालं चिंगी खूपच दमली पळून पळून खरेच थकली मग तिने

सायंकाळी आकाश रंगीबेरंगी कसे दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील  रोजच्याप्रमाणे सीता व नीता सायंकाळी या शाळेतून घरी आल्या. आपला गृहपाठ आटोपून मावशीला

विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय

दि विशाल मुंबई शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. भाऊ राणे, लक्ष्मण आर. प्रभू, विश्वनाथ

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर, सीनिअर (नाईट) कॉलेज (कामोठे)

कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना जून २००५ मध्ये करण्यात आली. कामोठे वसाहतीतील व ग्रामीण