पाणी हेच जीवन : कविता आणि काव्यकोडी

पाणी आहे म्हणून तर
सृष्टी झाली निर्माण
पाण्यामुळेच चराचरात
फुलले पंचप्राण


पाणी पिऊन हुशार होऊन
हसले पान न् पान
झाडेवेली बहरून गेली
डोलू लागले रान


पाण्यामुळेच सुखावतो
ओसाड उजाड माळ
पाण्यामुळेच आपला
सुरक्षित भविष्यकाळ


पाण्याअभावी जीवानाचे
होई वैराण वाळवंट
डोळ्यांत दाटते पाणी
आणि शुष्क होई कंठ


म्हणूनच पाणी नुसतं
आपल्यासाठी नाही द्रव्य
पृथ्वीचं स्पंदन ते
आपल्यासाठी अमृततुल्य


पाणी देते प्राणिमात्रांच्या
जीवास जीवनदान
म्हणूनच पाणी जपण्याचे
करूया सर्वश्रेष्ठ काम



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) लहान मोठ्या साऱ्यांची
भाषा त्याला येई
गाणी, गोष्टी आणखी
सांगे बरेच काही


कपाटात बसायला
नाही त्याला आवडत
ज्ञानाचा खजिना
पानांत कोण दडवत?


२) उन्हात उभे राहून
सावलीत साऱ्यांना घेतात
शुद्ध प्राणवायूही
भरभरून देतात


पर्यावरणाचा समतोल
राखतात किती छान
सांगा मुलं कोणाची
फळ, फूल, पान?


३) सागर काठांवर
असे यांची दाटी
ओल्या, सुक्यांची
होते मग वाटी


भाजीत घालतात
करंजीत भरतात
देवापुढे कोणाची
शेंडी बर धरतात?



उत्तर -


१)पुस्तक


२) झाड


३) नारळ

Comments
Add Comment

वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता