Mumbai airport : एका विमानाचं उड्डाण तर दुसऱ्याचं लँडिंग! मोठी दुर्घटना होता होता टळली...

मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत झाली मोठी चूक


मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याने हा प्रकार घडला. एकाच धावपट्टीवर दोन विमानांना परवानगी देण्यात आली, मात्र दोन्ही विमाने काहीशा वेळेच्या फरकाने जवळ आल्याने हा अपघात टळला. समोर आलेल्या माहितीनुसार, काल सकाळच्या सुमारास इंडिगोचे (Indigo) विमान रनवेवर उतरत होते, तर एअर इंडियाचे (Air India) विमान टेक ऑफ करण्यासाठी रनवेवर धावत होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ बाहेर आला आहे.


एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला होता. एअर इंडियाचं विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लैंडिंग होत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट ५०५३ रनवे क्रमाक २७ वर उतरणार होते. त्याचवेळी एअर इंडियाची फ्लाइट ६५७ टेक ऑफ करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ही टक्कर वाचली. एअर इंडियाचे विमान है तिरुअनंतपुरमसाठी उड्‌डाण करणार होते अशी माहिती समोर आली आहे.


मुंबई विमानतळावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एअर इंडियाचे विमान रनवेवर वेगाने जात होते, तर त्याचवेळी इंडिगोचे विमान लैंडिंग करत असल्याचे दिसत आहे. मात्र, जेव्हा इंडिगोचे विमान एअर इंडियाच्या विमानाजवळ आले तोपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केले होते. त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे, असे व्हिडीओत दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.


रन वे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस