Mumbai airport : एका विमानाचं उड्डाण तर दुसऱ्याचं लँडिंग! मोठी दुर्घटना होता होता टळली...

मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत झाली मोठी चूक


मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याने हा प्रकार घडला. एकाच धावपट्टीवर दोन विमानांना परवानगी देण्यात आली, मात्र दोन्ही विमाने काहीशा वेळेच्या फरकाने जवळ आल्याने हा अपघात टळला. समोर आलेल्या माहितीनुसार, काल सकाळच्या सुमारास इंडिगोचे (Indigo) विमान रनवेवर उतरत होते, तर एअर इंडियाचे (Air India) विमान टेक ऑफ करण्यासाठी रनवेवर धावत होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ बाहेर आला आहे.


एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला होता. एअर इंडियाचं विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लैंडिंग होत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट ५०५३ रनवे क्रमाक २७ वर उतरणार होते. त्याचवेळी एअर इंडियाची फ्लाइट ६५७ टेक ऑफ करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ही टक्कर वाचली. एअर इंडियाचे विमान है तिरुअनंतपुरमसाठी उड्‌डाण करणार होते अशी माहिती समोर आली आहे.


मुंबई विमानतळावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एअर इंडियाचे विमान रनवेवर वेगाने जात होते, तर त्याचवेळी इंडिगोचे विमान लैंडिंग करत असल्याचे दिसत आहे. मात्र, जेव्हा इंडिगोचे विमान एअर इंडियाच्या विमानाजवळ आले तोपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केले होते. त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे, असे व्हिडीओत दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.


रन वे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक