T-20 world cup 2024: पाकिस्तानचा भेदक मारा, भारताचा डाव ११९ वर आटोपला

  52

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलावले. मात्र पाकिस्तानचा हा डाव यशस्वी ठरला.


पाकिस्तानने असा भेदक मारा केला की भारताचा डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. भारताकडून विकेटकीपर ऋषभ पंतने ४२ धावा करत निकराचा लढा दिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. पंतपाठोपाठ अक्षरने २० धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने १२ धावा केल्या. भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत.


पाकिस्तानच्या नसीम शाहने आणि हरिस रौफने जबरदस्त गोलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना एकामागोएक बाद केले. त्यांनी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावा हव्या आहेत.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे