T-20 world cup 2024: पाकिस्तानचा भेदक मारा, भारताचा डाव ११९ वर आटोपला

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलावले. मात्र पाकिस्तानचा हा डाव यशस्वी ठरला.


पाकिस्तानने असा भेदक मारा केला की भारताचा डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. भारताकडून विकेटकीपर ऋषभ पंतने ४२ धावा करत निकराचा लढा दिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. पंतपाठोपाठ अक्षरने २० धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने १२ धावा केल्या. भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत.


पाकिस्तानच्या नसीम शाहने आणि हरिस रौफने जबरदस्त गोलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना एकामागोएक बाद केले. त्यांनी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावा हव्या आहेत.

Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा