Monsoon Update: मान्सूनने घेतला वेग, महाराष्ट्रात जोरदार सरी, कोकणात रेड अलर्ट

मुंबई: देशभरात मान्सून(monsoon) वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई तसेच रायगडसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


आयएमडीच्या शक्यतेनुसार या भागांमध्ये वीज चमकण्यासोबतच वेगवान वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आयएमडी कार्यालयाने शनिवारी हे अलर्ट जारी केले.


आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात रविवारी सकाळी ४ वाजल्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील विविध स्थानांवर वीज चमकण्यापासून ते मध्यम ते भारी स्वरूपाचा पावसासोबत ४०-५० किमी प्रति तासा वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने खराब हवामान पाहता लोकांना बाहेर पडताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, रविवारी सकाळई मुंबईच्या विविध भागांमध्ये पाऊस झाला.


भारतीय हवामान विभागाने शनिवारी म्हटले होते दक्षिण-पश्चिम मान्सून मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये तसेच किनाऱ्यावर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या