Monsoon Update: मान्सूनने घेतला वेग, महाराष्ट्रात जोरदार सरी, कोकणात रेड अलर्ट

मुंबई: देशभरात मान्सून(monsoon) वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई तसेच रायगडसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


आयएमडीच्या शक्यतेनुसार या भागांमध्ये वीज चमकण्यासोबतच वेगवान वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आयएमडी कार्यालयाने शनिवारी हे अलर्ट जारी केले.


आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात रविवारी सकाळी ४ वाजल्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील विविध स्थानांवर वीज चमकण्यापासून ते मध्यम ते भारी स्वरूपाचा पावसासोबत ४०-५० किमी प्रति तासा वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने खराब हवामान पाहता लोकांना बाहेर पडताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, रविवारी सकाळई मुंबईच्या विविध भागांमध्ये पाऊस झाला.


भारतीय हवामान विभागाने शनिवारी म्हटले होते दक्षिण-पश्चिम मान्सून मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये तसेच किनाऱ्यावर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था