Monsoon Update: मान्सूनने घेतला वेग, महाराष्ट्रात जोरदार सरी, कोकणात रेड अलर्ट

मुंबई: देशभरात मान्सून(monsoon) वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई तसेच रायगडसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


आयएमडीच्या शक्यतेनुसार या भागांमध्ये वीज चमकण्यासोबतच वेगवान वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आयएमडी कार्यालयाने शनिवारी हे अलर्ट जारी केले.


आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात रविवारी सकाळी ४ वाजल्यापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील विविध स्थानांवर वीज चमकण्यापासून ते मध्यम ते भारी स्वरूपाचा पावसासोबत ४०-५० किमी प्रति तासा वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने खराब हवामान पाहता लोकांना बाहेर पडताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, रविवारी सकाळई मुंबईच्या विविध भागांमध्ये पाऊस झाला.


भारतीय हवामान विभागाने शनिवारी म्हटले होते दक्षिण-पश्चिम मान्सून मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागांमध्ये तसेच किनाऱ्यावर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम