Modi Cabinet: नितीन गडकरी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल...मोदी कॅबिनेटच्या संभाव्य मंत्र्यांकडे येऊ लागले फोन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदी कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांकडे फोन येऊ लागले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार नितीन गडकरी, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान आणि अनुप्रियया पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.


चिराग पासवान यांचा पक्ष LJPRने बिहारमध्ये पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागांवर ते यशस्वी ठरले होते. चिराग स्वत: हाजीपूर येथून निवडणूक जिंकले होते. तर नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. गडकरी सलग दोन वेळा मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत .


तर अनुप्रिया पटेल यांचा अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. यात अनुप्रिया पटेल यांना आपल्या जागेवर विजय मिळाला होता. तर जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चा यांच्या खात्यात एनडीएकडून एकच जागा गेली होती. या जागेवर त्यांनी खुद्द निवडणूक लढवली होती आणि तेथून ते जिंकलेही. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि दोनही जागांवर ते निवडणूक जिंकले.



शपथ घेणाऱ्या खासदारांना भेटणार मोदी


नरेंद्र मोदी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत सकाळी ११.३० वाजता चहाची भेट घेणार आहेत. ाया बैठकीत खासदारांना त्यांना दिल्या जाणाऱ्या मंत्रालयाची माहिती दिली जाईल. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ