मुंबई : दुपारच्या वेळी जाणवणारा प्रचंड उकाडा आणि वातावरणातील एकंदर स्थिती पाहता मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तर मान्सूनने बहुतांश जिल्हे व्यापण्यास सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अशातच वीकेंडला काही भागात वादळी पावसासह हवामान विभागाने (IMD)यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीसह कोल्हापूर या भागांपर्यंत मजल मारली आहे. त्यानुसार आज विदर्भासह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा अंदाज पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मस्त्य व्यवसायिकांना महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, ११ जून दरम्यान समुद्रात ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वार वाहणार असून हा वेग ५५ किमीपर्यंतही पोहोचू शकतो. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…