Nandurbar News : चांदसैली घाटात पुन्हा दरड कोसळली; प्रवाशांचा जीव टांगणीला

दोन तासांपासून वाहतूक सेवा विस्कळीत


नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चांदसैली घाट (Chandsaili Ghat) हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याच्या (Land collapsed) घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे वाहतुकीची (Transportation) समस्या निर्माण होत असते. अशीच घटना पुन्हा चांदसैली घाटात घडली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांपासून घाटातील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरू असतानाच ही दरड कोसळली, मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्या तरीही आमदार के.सी. पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी याबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.



बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


चांदसैली घाटातील रस्ता तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा दरड प्रवण भाग असून या घाटात नेहमी दरड कोसळत असतात. परंतु बांधकाम विभागाकडून याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यावर्षीही या भागात पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन