Nitish Kumar : इंडिया आघाडीने नितीश कुमारांना दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर जेडीयूने फेटाळली!

जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एनडीएने (NDA) २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले, परंतु एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३२ जागांसह चांगली कामगिरी केली. त्यामुळे देशात एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडीचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि जेडीयूचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांची यामध्ये किंगमेकरची भूमिका होती. मात्र, दोघांनीही भाजपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर जेडीयूचे नेते के. सी. त्यागी (K. C. Tyagi) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती मात्र जेडीयूने (JDU) ती फेटाळली, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला आहे.


केसी त्यागी म्हणाले की, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमारांना ऑफर दिली. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांना संयोजक केलं नाही. पण आज तेच लोक पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने एनडीएमध्ये आहोत, अशी के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं.



नितीश कुमार काय म्हणाले?


नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू. जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.


इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी