Nitish Kumar : इंडिया आघाडीने नितीश कुमारांना दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर जेडीयूने फेटाळली!

जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एनडीएने (NDA) २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले, परंतु एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३२ जागांसह चांगली कामगिरी केली. त्यामुळे देशात एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडीचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि जेडीयूचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांची यामध्ये किंगमेकरची भूमिका होती. मात्र, दोघांनीही भाजपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर जेडीयूचे नेते के. सी. त्यागी (K. C. Tyagi) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती मात्र जेडीयूने (JDU) ती फेटाळली, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला आहे.


केसी त्यागी म्हणाले की, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमारांना ऑफर दिली. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांना संयोजक केलं नाही. पण आज तेच लोक पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने एनडीएमध्ये आहोत, अशी के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं.



नितीश कुमार काय म्हणाले?


नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू. जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.


इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे