Nitish Kumar : इंडिया आघाडीने नितीश कुमारांना दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर जेडीयूने फेटाळली!

जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एनडीएने (NDA) २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले, परंतु एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३२ जागांसह चांगली कामगिरी केली. त्यामुळे देशात एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडीचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि जेडीयूचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांची यामध्ये किंगमेकरची भूमिका होती. मात्र, दोघांनीही भाजपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर जेडीयूचे नेते के. सी. त्यागी (K. C. Tyagi) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती मात्र जेडीयूने (JDU) ती फेटाळली, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला आहे.


केसी त्यागी म्हणाले की, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमारांना ऑफर दिली. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांना संयोजक केलं नाही. पण आज तेच लोक पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने एनडीएमध्ये आहोत, अशी के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं.



नितीश कुमार काय म्हणाले?


नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू. जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.


इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.

Comments
Add Comment

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास