Nitish Kumar : इंडिया आघाडीने नितीश कुमारांना दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर जेडीयूने फेटाळली!

  85

जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एनडीएने (NDA) २९३ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले, परंतु एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर इंडिया आघाडीनेही (INDIA Alliance) २३२ जागांसह चांगली कामगिरी केली. त्यामुळे देशात एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडीचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि जेडीयूचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांची यामध्ये किंगमेकरची भूमिका होती. मात्र, दोघांनीही भाजपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर जेडीयूचे नेते के. सी. त्यागी (K. C. Tyagi) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. इंडिया आघाडीने नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती मात्र जेडीयूने (JDU) ती फेटाळली, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला आहे.


केसी त्यागी म्हणाले की, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमारांना ऑफर दिली. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांना संयोजक केलं नाही. पण आज तेच लोक पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने एनडीएमध्ये आहोत, अशी के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं.



नितीश कुमार काय म्हणाले?


नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षापासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू. जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.


इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने