Delhi Fire : अग्नितांडव! दिल्लीतील फूड फॅक्टरीला भीषण आग

  68

तिघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी


नवी दिल्ली : उन्हाच्या कडाक्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशाची राजधानी दिल्ली येथेही अशीच एक घटना घडली आहे. दिल्ली येथील (Delhi) नरेला परिसरातील एका फूड फॅक्टरीला (Food Factory) आज पहाटे भीषण आग (Fire News) लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या अग्नितांडवामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी डाळ भाजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी आला. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. मात्र काही कामगारांना वेळीच बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत अनेक कामगार अडकले होते. परंतु अग्निशमन दलाच्या विभागाकडून (Fire Brigade) अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे.



जखमींची माहिती


अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये श्याम (२४), राम सिंग (३०) बीरपाल (४२)या तिघांना मृत घोषित केले. आणि इतर ६ कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर एसएचआरसी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.


दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचे समोर आले आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.