Delhi Fire : अग्नितांडव! दिल्लीतील फूड फॅक्टरीला भीषण आग

Share

तिघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : उन्हाच्या कडाक्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशाची राजधानी दिल्ली येथेही अशीच एक घटना घडली आहे. दिल्ली येथील (Delhi) नरेला परिसरातील एका फूड फॅक्टरीला (Food Factory) आज पहाटे भीषण आग (Fire News) लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या अग्नितांडवामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी डाळ भाजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी आला. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. मात्र काही कामगारांना वेळीच बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत अनेक कामगार अडकले होते. परंतु अग्निशमन दलाच्या विभागाकडून (Fire Brigade) अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

जखमींची माहिती

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये श्याम (२४), राम सिंग (३०) बीरपाल (४२)या तिघांना मृत घोषित केले. आणि इतर ६ कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर एसएचआरसी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचे समोर आले आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Recent Posts

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

13 mins ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

47 mins ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

2 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

2 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

4 hours ago