Delhi Fire : अग्नितांडव! दिल्लीतील फूड फॅक्टरीला भीषण आग

तिघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी


नवी दिल्ली : उन्हाच्या कडाक्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना देशाची राजधानी दिल्ली येथेही अशीच एक घटना घडली आहे. दिल्ली येथील (Delhi) नरेला परिसरातील एका फूड फॅक्टरीला (Food Factory) आज पहाटे भीषण आग (Fire News) लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील या अग्नितांडवामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फूड फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी डाळ भाजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी आला. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. मात्र काही कामगारांना वेळीच बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत अनेक कामगार अडकले होते. परंतु अग्निशमन दलाच्या विभागाकडून (Fire Brigade) अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे.



जखमींची माहिती


अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये श्याम (२४), राम सिंग (३०) बीरपाल (४२)या तिघांना मृत घोषित केले. आणि इतर ६ कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर एसएचआरसी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.


दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कच्चे मूग गॅस बर्नरवर भाजले जात असल्याचे समोर आले आहे. गॅस लीक झाल्यामुळे आग पसरली, ज्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम झाला आणि स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या