RBI Repo Rate : कर्जदारांना दिलासा नाहीच! आरबीआयने रेपो रेटबाबत घेतला 'हा' निर्णय

मुंबई : नव्या आर्थिक वर्षात आरबीआयकडून नवी नियमावली जाहीर केली जाते. अशातच नवे आर्थिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही कर्जाचा मासिक हप्त्याचा व्याजदर कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांची आज निराशा झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज नवे पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये पतधोरण धोरण समितीने (MPC) रेपो दर (Repo Rate) न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईतही कर्जदारांना दिलासा मिळत नसल्याचे दिसून येते.


शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळीही बैठकीत उपस्थित सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला असून आता एक वर्षांनंतरही आरबीआयचा मुख्य कर्ज दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीने सलग आठव्यांदा रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुख्य व्याजदरात आरबीआयने ०.२५ टक्क्यांची वाढ केली होती, मात्र तेव्हापासून आतापर्यंत मुख्य व्याजदर जशाच तसे ठेवण्यात आले आहेत.


त्याचबरोबर रेपो दर स्थिर राहिल्याने स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचे (SDF) दर पूर्वीप्रमाणेच ६.२५ टक्के राहणार आहेत. तर मार्जिनिल स्टँडिंग फॅसिलिटीचे दर ६.७५ टक्के राहणार आहेत.



महागाईची चिंता कायम


वाढत्या महागाईच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आरबीआय धोरणात्मक दराबाबत यथास्थिती कायम ठेवेल, असा तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता. मात्र युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ कॅनडाने प्रमुख धोरण दरात कपात करण्यास सुरुवात केली असून आर्थिक विकासाचा वेग वाढत असल्याने एमपीसी पॉलिसी रेट कमी करणे टाळू शकते.



आर्थिक विकासावर आरबीआयचे विधान


इंधनाच्या किमतीत चलनवाढ होत आहे, परंतु अन्नधान्य महागाई अजूनही उच्च असल्याचे दास यांनी सांगितले. याशिवाय भविष्यातही खाद्यपदार्थांच्या किमती चढ्या राहू शकतात. सामान्य पावसामुळे खरीपाचे उत्पादन वाढण्याचे अपेक्षित असून आरबीआयने आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्क्यावरून ७.२ टक्के केला आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च