Mhada : सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार

  111

म्हाडा उभारणार तब्बल ३६०० घरे


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अवघड होत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडा (Mhada) आणि सिडकोकडून (CIDCO) उपलब्ध होणाऱ्या घरांची वाट पाहात असतात. अशातच मुंबईत घर घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती मिळत आहे. म्हाडा मुंबईत (Mumbai) घरे उभारण्याच्या तयारीत असल्यामुळे आता सर्वसामान्यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून दरवर्षी घरांची लॉटरी काढली जाते. म्हाडाच्या इतर मंडळाच्या तुलनेत मुंबईमधील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी म्हाडाने मुंबईत ४,०८२ घरांची लॉटरी काढली होती. यामध्ये तब्बल १ लाख २२ हजार अर्ज प्राप्त झाले होते. आता या आर्थिक वर्षात म्हाडा मुंबईत ३,६०० घरे उभारण्याचे नियोजन केले आहे. मुंबई शहरासह उपनगरातही घरे असणार आहेत. यामध्ये अ‍ॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, मागाठाणे, पहाडी गोरेगाव अशा विविध ठिकाणी ही घरे असणार आहेत.



वर्षभरात १३ हजार घरांची निर्मिती


म्हाडाच्या प्रत्येक मंडळाकडून वर्षभारत किमान एक लॉटरी काढली जाते. त्यानुसार या आर्थिक वर्षात मुंबईसह पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती येथे सुमारे १२ ते १३ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :