Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांचा नकार!

काय आहे कारण?


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीतच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते. येत्या शनिवारपासून ते आमरण उपोषण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगेंना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्यामागची काही कारणेही समोर आली आहेत.


ज्या गावातून मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभरात पेटला त्या अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच काही दिवसांपूर्वी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला होता. तसे निवेदनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. या निवेदनात ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये’, अशी मागणी केली होती. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला. निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या असल्याने जरांगे यांचं उपोषण वादात सापडलं. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं हे एक कारण आहे.


यासोबतच ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या