Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास कोण होणार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री?

'या' पाच नेत्यांच्या नावाची चर्चा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election results) महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. यानंतर दुसर्‍याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व पराभवाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, याबाबत भाजपच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे, तर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील फडणवीसांसोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. या चर्चेत फडणवीसांच्या राजीनाम्यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


महाराष्ट्रात यंदा भाजपचं वर्चस्व कमी झाल्याचं दिसून आलं. आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शुन्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत. ते राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही, अशी इच्छा त्यांनी अमित शाहांजवळ बोलून दाखवली. त्यावर अमित शाह यांनी राजीनामा न देता काम सुरु ठेवण्याचा सल्ला फडणवीसांना दिला आहे. मात्र, फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीसाठी अमित शाह, राजनाथ सिंह पोहोचले आहेत, तर अजित पवार, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे देखील बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.



उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची चर्चा?


दरम्यान, दिल्लीत आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच चर्चेत आलं आहे. फडणवीस जर आपल्या निर्णयावरुन मागे हटले नाहीत, तर त्या ठिकाणी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात गिरीश महाजनांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी कायम गिरीश महाजन (Girish Mahajan) असतात. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांची पक्षाचे संकटमोचक व संयमी नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. कुठली अडचण असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाते. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर समतोल साधणारा नेता म्हणून गिरीश महाजन हे परफेक्ट असू शकतात, अशी चर्चा आहे.


याशिवाय महाराष्ट्रातील आणखी चार नेत्यांची नावे देखील उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार व विनोद तावडे यांच्या नावांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन