Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास कोण होणार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री?

'या' पाच नेत्यांच्या नावाची चर्चा


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election results) महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. यानंतर दुसर्‍याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व पराभवाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, याबाबत भाजपच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे, तर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनीदेखील फडणवीसांसोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. या चर्चेत फडणवीसांच्या राजीनाम्यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिल्यास महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


महाराष्ट्रात यंदा भाजपचं वर्चस्व कमी झाल्याचं दिसून आलं. आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचं पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शुन्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत. ते राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही, अशी इच्छा त्यांनी अमित शाहांजवळ बोलून दाखवली. त्यावर अमित शाह यांनी राजीनामा न देता काम सुरु ठेवण्याचा सल्ला फडणवीसांना दिला आहे. मात्र, फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीसाठी अमित शाह, राजनाथ सिंह पोहोचले आहेत, तर अजित पवार, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे देखील बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.



उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची चर्चा?


दरम्यान, दिल्लीत आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच चर्चेत आलं आहे. फडणवीस जर आपल्या निर्णयावरुन मागे हटले नाहीत, तर त्या ठिकाणी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात गिरीश महाजनांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी कायम गिरीश महाजन (Girish Mahajan) असतात. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांची पक्षाचे संकटमोचक व संयमी नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. कुठली अडचण असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाते. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर समतोल साधणारा नेता म्हणून गिरीश महाजन हे परफेक्ट असू शकतात, अशी चर्चा आहे.


याशिवाय महाराष्ट्रातील आणखी चार नेत्यांची नावे देखील उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार व विनोद तावडे यांच्या नावांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक