MNS Election : पक्षस्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेअंतर्गत होणार खुली निवडणूक!

राज ठाकरेंच्या वाढदिवशी होणार मनसेच्या अध्यक्षपदाचा निर्णय


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) म्हणजेच मनसेच्या संपूर्ण राजकीय वाटचालीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवशी १४ जूनला मनसेमध्ये पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणूक (Election within party) पार पडणार आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्षपदासाठी (MNS President) ही खुली निवडणूक होणार आहे. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे १४ जूनला दुपारी ३ वाजता ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.


मनसेचे नेते व सरचिटणीस यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षांतर्गत निवडणुका याआधीही होत होत्या, पण त्या कागदोपत्री पार पाडल्या जात असत. यावेळेस प्रथमच खुली निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे, मात्र, तरीही सावधगिरी म्हणून ही निवडणूक घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.



का घेण्यात आला हा निर्णय?


महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात राजकीय सत्तांतरे झाली. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये कायदेशीर आणि निवडणूक आयोगाच्या दालनात जो संघर्ष झाला, सुनावण्या पार पडल्या त्याचे राज्याच्या राजकारणावर झालेले परिणाम अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. वारसा हक्काने आलेल्या अध्यक्षपदामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आपल्याला वगळले जात असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यातून हे पक्ष फुटले. ही बाब लक्षात घेऊन मनसेअंतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन