World cup 2024: भारताच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले आयर्लंडचे फलंदाज, केल्या फक्त इतक्या धावा

न्यूयॉर्क: भारत आणि आयर्लंड(india vs ireland) यांच्यात आज टी-२० वर्ल्डकपचा(t-20 world cup 2024) सामना रंगत आहे. भारताने या सामन्यात टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी अतिशय योग्य ठरवला.


भारताच्या गोलंदाजांनी इतका तिखट मारा केला की आयर्लंडचे फलंदाज शंभर धावाही पूर्ण करू शकले नाहीत. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल या पंचकाने जबरदस्त मारा करताना आयर्लंडचा डाव मोडून काढला.


आयर्लंडला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ इतक्याच धावा करता आल्या. सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत हा सामना खेळत आहे.


आयर्लंडने १६ षटकांत केवळ ९६ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी केवळ ९७ धावांचे आव्हान आहे. आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.

Comments
Add Comment

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड