World cup 2024: भारताच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले आयर्लंडचे फलंदाज, केल्या फक्त इतक्या धावा

न्यूयॉर्क: भारत आणि आयर्लंड(india vs ireland) यांच्यात आज टी-२० वर्ल्डकपचा(t-20 world cup 2024) सामना रंगत आहे. भारताने या सामन्यात टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी अतिशय योग्य ठरवला.


भारताच्या गोलंदाजांनी इतका तिखट मारा केला की आयर्लंडचे फलंदाज शंभर धावाही पूर्ण करू शकले नाहीत. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल या पंचकाने जबरदस्त मारा करताना आयर्लंडचा डाव मोडून काढला.


आयर्लंडला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ इतक्याच धावा करता आल्या. सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत हा सामना खेळत आहे.


आयर्लंडने १६ षटकांत केवळ ९६ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी केवळ ९७ धावांचे आव्हान आहे. आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.

Comments
Add Comment

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर