World cup 2024: भारताच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले आयर्लंडचे फलंदाज, केल्या फक्त इतक्या धावा

Share

न्यूयॉर्क: भारत आणि आयर्लंड(india vs ireland) यांच्यात आज टी-२० वर्ल्डकपचा(t-20 world cup 2024) सामना रंगत आहे. भारताने या सामन्यात टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी अतिशय योग्य ठरवला.

भारताच्या गोलंदाजांनी इतका तिखट मारा केला की आयर्लंडचे फलंदाज शंभर धावाही पूर्ण करू शकले नाहीत. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल या पंचकाने जबरदस्त मारा करताना आयर्लंडचा डाव मोडून काढला.

आयर्लंडला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ इतक्याच धावा करता आल्या. सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत हा सामना खेळत आहे.

आयर्लंडने १६ षटकांत केवळ ९६ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी केवळ ९७ धावांचे आव्हान आहे. आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

6 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

7 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago