T-20 world cup 2024: भारताचा आयर्लंडवर ८ विकेटनी विजय, रोहितचे अर्धशतक

न्यूयॉर्क: टीम इंडियाने(team india) टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) आपल्या अभियानाची विजयी सुरूवात केली आहे. आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान १२.२ षटकांत २ विकेट गमावत पूर्ण केले.


भारताकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ३७ बॉलमध्ये ५२ धावा तडकावल्या. सलामीला आलेला विराट कोहली एकच धाव करून बाद झाला. तर ऋषभ पंत ३६ धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने २ धावा केल्या.


याआधी भारताच्या तिखट माऱ्यासमोर आयर्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. हार्दिक पांड्याच्या ३ विकेट, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहच्या प्रत्येकी २ विकेट याच्या जोरावर आयर्लंडला केवळ ९६ धावाच करता आल्या होत्या.आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.


सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने हा सामना जिंकला आहे.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे