न्यूयॉर्क: टीम इंडियाने(team india) टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) आपल्या अभियानाची विजयी सुरूवात केली आहे. आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९६ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान १२.२ षटकांत २ विकेट गमावत पूर्ण केले.
भारताकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ३७ बॉलमध्ये ५२ धावा तडकावल्या. सलामीला आलेला विराट कोहली एकच धाव करून बाद झाला. तर ऋषभ पंत ३६ धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने २ धावा केल्या.
याआधी भारताच्या तिखट माऱ्यासमोर आयर्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. हार्दिक पांड्याच्या ३ विकेट, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहच्या प्रत्येकी २ विकेट याच्या जोरावर आयर्लंडला केवळ ९६ धावाच करता आल्या होत्या.आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीने सर्वाधिक २६ धावा करत संघाला थोडाफार स्कोर मिळवून देण्यात मदत केली.
सुरूवातीपासूनच आयर्लंडचे फलंदाज अंतराअंतराने बाद होत गेले. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने हा सामना जिंकला आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…