Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना धक्का! अंतरिम जामीन अर्ज फेटाळत तुरुंगवासातही वाढ

  63

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लँड्रिंगचा आरोप आहे. त्या प्रकरणी ते दीड महिना तुरुंगात होते. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी त्यांचा २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. हा अंतरिम जामीन (Interim Bail) संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले. मात्र, त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळत केजरीवालांच्या तुरुंगवासात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांसाठी हा मोठा धक्का आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. राऊज ॲव्हेन्यूच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ केली आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव ७ दिवसांच्या जामीनासाठी अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली अंतरिम जामिनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. असे असले तरी न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.


ईडीकडून अंतरिम जामिनास जोरदार विरोध


यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला होता. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाच्या काळात वैद्यकीय चाचण्यांऐवजी प्रचारसभांना संबोधित केले असून ते आजारी नाहीत हे स्पष्ट दिसून येत होते. तसेच त्यांचे वजन सात किलोंनी घटले नसून एक किलोने वाढल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा केजरीवालांना दिलासा मिळाला नाही.

Comments
Add Comment

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :