Chandrababu Naidu : इंडिया की एनडीए? चंद्राबाबूंच्या निर्णयाने फासे फिरणार?

  104

चंद्राबाबूंनी जाहीर केला मोठा निर्णय 


नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाला असून या एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपा किंवा काँग्रेसपैकी एकही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकलेला नाही. त्यामुळे यंदा सत्तास्थापनेच्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. त्यातच चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे फासे फिरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


चंद्राबाबू नायडू यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. चंद्राबाबू यांनी त्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्येच राहणार आहे. तसेच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच आपण आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला २४० जागा जिंकण्यात यश आलं असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९४ जागा जिंकल्या आहेत. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष १६ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्तास्थापनेमध्ये आणि पुढील सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )