नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाला असून या एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपा किंवा काँग्रेसपैकी एकही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकलेला नाही. त्यामुळे यंदा सत्तास्थापनेच्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. त्यातच चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे फासे फिरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. चंद्राबाबू यांनी त्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्येच राहणार आहे. तसेच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच आपण आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला २४० जागा जिंकण्यात यश आलं असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९४ जागा जिंकल्या आहेत. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष १६ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्तास्थापनेमध्ये आणि पुढील सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…