Chandrababu Naidu : इंडिया की एनडीए? चंद्राबाबूंच्या निर्णयाने फासे फिरणार?

चंद्राबाबूंनी जाहीर केला मोठा निर्णय 


नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर झाला असून या एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले असून पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपा किंवा काँग्रेसपैकी एकही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकलेला नाही. त्यामुळे यंदा सत्तास्थापनेच्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. त्यातच चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे फासे फिरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


चंद्राबाबू नायडू यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. चंद्राबाबू यांनी त्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्येच राहणार आहे. तसेच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच आपण आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला २४० जागा जिंकण्यात यश आलं असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९४ जागा जिंकल्या आहेत. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष १६ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्तास्थापनेमध्ये आणि पुढील सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा