Kalki 2898 AD Trailer : प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट जारी

मुंबई : प्रभासचा बहुप्रतिक्षीत 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) चित्रपटाचे लाखो चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच चाहत्यांना एक आनंदाची माहिती मिळत आहे. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. तर चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) कधी पाहायला मिळणार याची प्रतिक्षा लागली होती. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'कल्की २८९८ एडी' ची ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.



'या' तारखेला होणार ट्रेलर रिलीज


नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला, 'कल्की २८९८ एडी' हा एक पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अनेक साऊथ कलाकारांनी कॅमिओ केला आहे. प्रेक्षकांना हा कॅमिओ पाहण्यासाठी केवळ काहीच दिवस वाट पहावी लागणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले. कल्की २८९८ एडी'चा ट्रेलर १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.



चित्रपटाचं बजेट तब्बल ६०० कोटी


'कल्की २८९८ एडी' चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दिशा पटानी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या पौराणिक चित्रपटामध्ये महाभारत ते इसवी सन २८९८ पर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. वैजयंती मूव्हीज आणि सी. आसवानी दत्त अंतर्गत हा चित्रपट निर्मित केला गेला आहे. तर हा चित्रपट सुमारे ६०० कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून