Devendra Fadnavis : ‘लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो; मला सरकारमधून मुक्त करा’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी


मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच, मला आता सकारमधून मोकळे करा, अशी विनंती मी भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच संविधान बदलणार या नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला याची कबुली देखील यावेळी फडणवीस यांनी दिली.


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.


फडणवीस म्हणाले की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे आणि नेहरुजींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपाने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू, असे फडणवीस म्हणाले.



नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला. प्रचारादरम्यान निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका देखिल आम्हाला बसला. यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकार मधून मोकळे करावे, अशी मागणी केली.


आम्हाला २०२९ मध्ये २७.८४ टक्के मत आणि २३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी दीड टक्का कमी मतदान मिळाले आणि नऊ जागा मिळाल्या. आम्हाला लोकांनी नाकारले नाही, असे देखील फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस