मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच, मला आता सकारमधून मोकळे करा, अशी विनंती मी भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच संविधान बदलणार या नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला याची कबुली देखील यावेळी फडणवीस यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
फडणवीस म्हणाले की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे आणि नेहरुजींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपाने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू, असे फडणवीस म्हणाले.
नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला. प्रचारादरम्यान निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका देखिल आम्हाला बसला. यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकार मधून मोकळे करावे, अशी मागणी केली.
आम्हाला २०२९ मध्ये २७.८४ टक्के मत आणि २३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी दीड टक्का कमी मतदान मिळाले आणि नऊ जागा मिळाल्या. आम्हाला लोकांनी नाकारले नाही, असे देखील फडणवीस म्हणाले.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…