नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असतानाच मिनिटामिनिटाला मतांची आकडेवारी बदलत आहे. त्यातच आता नवी दिल्लीतून (New Delhi) आप (AAP) आणि काँग्रेस (Congress) मागे पडले असल्याचे चित्र आहे, तर भाजपाने (BJP) या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे. नवी दिल्लीसोबतच भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि नवी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी एकतर्फी पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीमध्ये (New Delhi) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी जामिनावर बाहेर येऊन प्रचार केल्यानंतरही आप आणि काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. भाजपने नवी दिल्लीतील सातही जागांवर आघाडी घेतली आहे.
नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून येत आहे. मद्य धोरण प्रकरणी अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवत प्रचार केला होता. मात्र, नवी दिल्लीत पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…