New Delhi Loksabha : नवी दिल्लीमध्ये भाजपाची जादू! आप आणि काँग्रेस पिछाडीवर

Share

जामिनावर सुटलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रचाराचा प्रभाव पडला कमी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असतानाच मिनिटामिनिटाला मतांची आकडेवारी बदलत आहे. त्यातच आता नवी दिल्लीतून (New Delhi) आप (AAP) आणि काँग्रेस (Congress) मागे पडले असल्याचे चित्र आहे, तर भाजपाने (BJP) या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे. नवी दिल्लीसोबतच भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि नवी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी एकतर्फी पाठिंबा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीमध्ये (New Delhi) आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी जामिनावर बाहेर येऊन प्रचार केल्यानंतरही आप आणि काँग्रेसला फायदा होताना दिसत नाही. भाजपने नवी दिल्लीतील सातही जागांवर आघाडी घेतली आहे.

नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  • चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल हे काँग्रेसच्या जय प्रकाश अग्रवाल यांच्यापेक्षा पुढे आहेत.
  • उत्तर पूर्व दिल्लीत मनोज तिवारी आणि कन्हैय्या कुमार यांच्यात लढत होती. इथं मनोज तिवारी आघाडीवर आहेत.
  • दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे हर्ष मल्होत्रा आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार लढत होते.
  • नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या बांसुरु स्वराज आघाडीवर असून त्यांच्याविरोधात लढत असलेले सोमनाथ भारती पिछाडीवर आहेत.
  • उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपचे योगेंद्र चंदोलिया आणि काँग्रेसचे उदित राज यांच्यात लढत होती. इथं योगेंद्र चंदोलिया आघाडीवर आहेत.
  • पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमलजीत सेहरावत यांनी आघाडी घेतली आहे. इथं आम आदमी पार्टीचे महाबल मिश्रा यांच्यात लढत होती.

लोकसभेसाठी मतदारांचा भाजपाला पाठिंबा

नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीतून दिसून येत आहे. मद्य धोरण प्रकरणी अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवत प्रचार केला होता. मात्र, नवी दिल्लीत पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

5 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago