Suicide news : मंत्रालयासमोरच्या इमारतीत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीची आत्महत्या!

  216

वकिलीचं घेत होती शिक्षण


मुंबई : मुंबईतून एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) यांच्या मुलीने राहत्या घराच्या इमारतीतील १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याने (IAS officer daughter commits Suicide) खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना मंत्रालयासमोरच (Mantralaya) घडली. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणं ही साधी गोष्ट नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे. तिथे १० व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. त्यांची मुलगी २७ वर्षांची होती व ती एलएलबीचं (LLB) शिक्षण घेत होती. तिने रात्रीच्या सुमारास दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला.


आत्महत्येमागे काय कारण आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काहीतरी माहिती समोर येऊ शकते. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.


Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या

आता गृहनिर्माण प्रकल्पाच्या महारेरा नोंदणी प्रमाणपत्रावर इत्यंभुत माहिती

 समग्र तपशील प्रमाणपत्राच्या परिशिष्टात मुंबई : येथून पुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि

BMC: महापालिकेच्या वतीने सुमारे २० हजार कोटींचा वातावरणीय अर्थसंकल्प

यंदा बेस्टचा समावेश, भविष्यात इतर प्राधिकरणे आणि मंडळांचाही होणार विचार मुंबई (खास प्रतिनिधी) : पर्यावरण

बीएमसीच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार शैक्षणिक साहित्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२,७१,२९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे