Suicide news : मंत्रालयासमोरच्या इमारतीत आयएएस अधिकार्‍याच्या मुलीची आत्महत्या!

वकिलीचं घेत होती शिक्षण


मुंबई : मुंबईतून एक मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) यांच्या मुलीने राहत्या घराच्या इमारतीतील १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याने (IAS officer daughter commits Suicide) खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना मंत्रालयासमोरच (Mantralaya) घडली. सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे जीवन संपवून घेणं ही साधी गोष्ट नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे. तिथे १० व्या मजल्यावर विकास रस्तोगी राहतात. त्यांची मुलगी २७ वर्षांची होती व ती एलएलबीचं (LLB) शिक्षण घेत होती. तिने रात्रीच्या सुमारास दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. उडी मारल्यानंतर ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला.


आत्महत्येमागे काय कारण आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काहीतरी माहिती समोर येऊ शकते. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.


Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच