Kolhapur accident : कोल्हापुरात भीषण अपघात; तिघांना चिरडले, सहा गंभीर जखमी

कोल्हापूर : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण संपूर्ण देशात गाजत असतानाच आज कोल्हापूर शहरात देखील असाच एक भीषण अपघात (Kolhapur accident) झाला. या अपघातात भरधाव वेगात असलेल्या कारने येथील कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या सायबर चौकात चार-पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या चौकात वाहतूक सुरू असताना अचानक एका भरधाव कारने राजारामपुरीकडून येताना चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


सायबर चौक हा राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम कॉलेजला जोडतो आणि या चौकात मोठी गर्दी असते. या चौकात अनेक शाळा आणि सायबर कॉलेज आहेत.


या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून कार चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. गंभीर जखमी असलेल्यांवर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,