Sushant Singh Rajput च्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली अदा शर्मा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आपल्या सिनेमांसोबतच पर्सनल लाईफमुळे सातत्याने चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी खबर आली होती की अदा सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहे. आता ही बातमी खुद्द अदाने कन्फर्म केली आहे. तिने सांगितले की चार महिन्यांपूर्वी ती या घरात शिफ्ट झाली होती. सोबतच तिने हे ही सांगितले की नव्या घरात तिला कसे वाटत आहे.


एका मुलाखतीत तिने आपल्या या निर्णयाबद्दल सांगितले. अदा म्हणाली, मी चार महिन्यांपूर्वी फ्लॅटमध्ये राहण्यास आली होती. मात्र बस्तर आणि द केरल स्टोरी ओटीटी रिलीज आणि काही प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी मथुरामध्ये हाथी सेंच्युरीमध्ये काही वेळ घालवला. नुकतीच मला काही वेळाची सुट्टी मिळाली आहे आणि अखेर मी येथे शिफ्ट झाले आहे.


मी माझ्या आयुष्यात पाली हिल या एकाच ठिकाणच्या घरात राहिली आहे आणि हे पहिल्यांदा झालेय की मी तेथून बाहेर आले आहे. येथील वाईब्स खूप संवेदनशील आहेत. येथे मला सकारात्मकता मिळते. केरळ आणि मुंबईतील आमची घरे झाडांनी घेरलेली आहेत.

घराचा बदलला लूक


अदाने हे घर ५ वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे. या घरात राहण्यासोबतच तिने संपूर्ण ट्रान्सफॉर्म केले आहे. तिने संपूर्ण अपार्टमेंट व्हाईट कलरने पेंट केले. सोबतच खालच्या मजल्यावर मंदिर बनवले आहे. वरच्या मजल्यावर एक म्युझिक रूम, डान्स स्टुडिओ आणि छताला गार्डन सेंच्युरीमध्ये बदलले आहे.
Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून