Crime : धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेऊन क्रूर पतीने केला पत्नीचा खून

मृतदेहाचे १४ तुकडे केले अन्...


भोपाळ : मध्य प्रदेशातील (MP) भोपाळमधून (Bhopal Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केली असल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर पुरावे लपविण्यासाठी आरोपीने आधी मृतदेह जाळून त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती व्यवसायाने ऑटोचालक आहे. परवाखेडा येथे राहणाऱ्या नदीम या ऑटो चालकाशी सानिया नावाच्या तरुणीचे लॉकडाऊन दरम्यान लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून नदीम सानियाच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून कारची मागणी करत होता. हुंडा न दिल्यानं तो तिचा छळ करत असायचा. इतकेच नव्हे तर नदीम सानियावर संशय घेऊन तिला मारहाणही करायचा. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी तिच्या बहिणीच्या घरी राहू लागली.


काही दिवसांनी नदीमने सानियाला भेटण्यासाठी घरी बोलावले होते. सानिया नदीमला भेटण्यासाठी गेली असता ती पुन्हा परतलीच नसल्याने सानियाच्या कुटुंबियांनी निशातपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सानियाच्या तपसादरम्यान नदीमही बेपत्ता झाल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याचाही शोध घेण्यात आला असता नदीमने सानियाची हत्या केली असल्याचे समोर आले.



आरोपीकडून गुन्ह्याची कबुली


पोलिसांनी नदीमला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सानियाच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्याने आधी तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला. मात्र त्याचे समाधान झाले नसल्याने आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आर्वालिया खंती येथून महिलेची कवटी, पाय आणि इतर अवशेष जप्त केले आहेत.



मुलीचा अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नदीम आणि सानिया यांना दोन महिन्यांची मुलगी होती. अडीच महिन्यांपूर्वी उकळत्या पाण्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूनंतर सानिया आणि नदीमचे नातेही बिघडले होते. त्यामुळे नदीम सानियावर जास्तच संशय घेत होता.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे