Crime : धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेऊन क्रूर पतीने केला पत्नीचा खून

मृतदेहाचे १४ तुकडे केले अन्...


भोपाळ : मध्य प्रदेशातील (MP) भोपाळमधून (Bhopal Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केली असल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर पुरावे लपविण्यासाठी आरोपीने आधी मृतदेह जाळून त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती व्यवसायाने ऑटोचालक आहे. परवाखेडा येथे राहणाऱ्या नदीम या ऑटो चालकाशी सानिया नावाच्या तरुणीचे लॉकडाऊन दरम्यान लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून नदीम सानियाच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून कारची मागणी करत होता. हुंडा न दिल्यानं तो तिचा छळ करत असायचा. इतकेच नव्हे तर नदीम सानियावर संशय घेऊन तिला मारहाणही करायचा. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी तिच्या बहिणीच्या घरी राहू लागली.


काही दिवसांनी नदीमने सानियाला भेटण्यासाठी घरी बोलावले होते. सानिया नदीमला भेटण्यासाठी गेली असता ती पुन्हा परतलीच नसल्याने सानियाच्या कुटुंबियांनी निशातपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सानियाच्या तपसादरम्यान नदीमही बेपत्ता झाल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याचाही शोध घेण्यात आला असता नदीमने सानियाची हत्या केली असल्याचे समोर आले.



आरोपीकडून गुन्ह्याची कबुली


पोलिसांनी नदीमला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सानियाच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्याने आधी तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला. मात्र त्याचे समाधान झाले नसल्याने आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आर्वालिया खंती येथून महिलेची कवटी, पाय आणि इतर अवशेष जप्त केले आहेत.



मुलीचा अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नदीम आणि सानिया यांना दोन महिन्यांची मुलगी होती. अडीच महिन्यांपूर्वी उकळत्या पाण्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूनंतर सानिया आणि नदीमचे नातेही बिघडले होते. त्यामुळे नदीम सानियावर जास्तच संशय घेत होता.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११