Crime : घरात घुसू्न चाकूच्या धाकाने वृद्ध महिलेला लुटले!

  59

महिलेचे हातपाय बांधले...तोंडात कापसाचा गोळा कोंबला...अन्...


अलिबाग : हेल्मेटधारी अज्ञाताने रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील ७० वर्षीय महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास घुसून तिला चाकुचा धाक दाखवित लुटल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


रेवदंडा आगरकोट किल्ल्यात श्रीसिध्देवर मंदिराशेजारी ७० वर्षीय रेश्मा रमेश पाटील या वयोवृध्द विधवा महिला एकटयाच राहातात. १ जून रोजी रात्री बारा ते दीडच्या सुमारास अज्ञात हेल्मेटधारी मोटर सायकलस्वाराने वृद्धेच्या घराचा दरवाजा ठोकावला आणि पाणी पिण्यासाठी मागितले. पाणी देण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता, अज्ञात हेल्मेटधारी घरात शिरला आणि चाकुचा धाक दाखवित वृद्धेचे हातपाय नायलॉनचे दोरीने बांधून तोंडात कापसाचा बोळा कोंबून त्यांच्या कानातील सोन्याच्या कुडया जबरीने काढून घेतल्या. त्याचबरोबर घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या डब्यातील सोन्याची बोरमाळ, तसेच रोख रक्कम २५ हजार रूपये असा एकूण एक लाख पंचवीस हजार रूपये किंमतीचा माल चोरून वृद्धेला किचन रूममध्ये कोंडून पळून गेला.


याबाबत रेश्मा रमेश पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात हेल्मेटधारी चोरटयाच्या विरोधात विविध कलमानव्ये जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, अलिबागटच्या उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पहाणी करीत केली असून, रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या