पुणे : यंदा मुंबईकरांसह पुणेकरांना (Mumbai-Pune) देखील उन्हाच्या तीव्र झळांसोबत भीषण पाणी टंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे मुंबई पुणे यासह अनेक जिल्ह्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी झाल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्यासोबतच भीषण पाणी टंचाईचा देखील ठरत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या खडकवासला (Khadakwasla) धरणात केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा उरला असल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ५.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १८.२५ टक्के इतके आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पानशेत वरसगाव टेमघर या धरणक्षेत्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तर खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षी आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास पाणी साठा कमी आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीसाठा पुरू शकणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय शिल्लक पाण्यातून पुणे शहर, दौंड शहराला पाणी पुरवठा करण्याचा जलसंपदा विभागाने प्रस्ताव मांडला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…