पुणे : यंदा मुंबईकरांसह पुणेकरांना (Mumbai-Pune) देखील उन्हाच्या तीव्र झळांसोबत भीषण पाणी टंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे मुंबई पुणे यासह अनेक जिल्ह्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी झाल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्यासोबतच भीषण पाणी टंचाईचा देखील ठरत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या खडकवासला (Khadakwasla) धरणात केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा उरला असल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ५.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १८.२५ टक्के इतके आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पानशेत वरसगाव टेमघर या धरणक्षेत्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तर खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षी आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास पाणी साठा कमी आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीसाठा पुरू शकणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय शिल्लक पाण्यातून पुणे शहर, दौंड शहराला पाणी पुरवठा करण्याचा जलसंपदा विभागाने प्रस्ताव मांडला आहे.
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…
तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून…
इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता…
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरून (Nashik Mumbai Highway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी (Toll) आता अधिक रक्कम मोजावी…