Mango : कोणी कोय देता का कोय...

जागतिक पर्यावरण दिनी नवी मुंबई महापालिका गोळा करणार आंब्याच्या कोयी


नवी मुंबई : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा (Mango) प्रत्येकाचे अत्यंत आवडीचे फळ आहे. रसाळ आंबा खाऊन तृप्त झाल्यानंतर त्या आंब्याची कोय (Mango seed) सर्वसाधारणपणे ओल्या कचऱ्यात टाकून दिली जाते. मात्र ही कोय जर मातीत रुजवली तर त्यापासून पुन्हा रसाळ आंबे देणारे झाड उगवू शकते आणि पुढच्याही पिढ्यांना तृप्त करू शकते. तसेच त्याच्या थंडगार पर्णछायेखाली गारवाही मिळू शकतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गाचे देणे निसर्गालाच परत करण्याचा प्रयत्न नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व उद्यान विभागाच्या वतीने आंब्याच्या कोयी संकलित करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.


स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानातही नवी मुंबई हे राज्यातील अग्रणी शहर असून, यामध्ये सुजाण नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच या अभियानांना पूरक असा नवी मुंबईच्या घराघरातून आंब्याच्या कोयी संकलित करून त्यामधून वृक्षसंपन्नता वाढविणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत ५ जून रोजी नवी मुंबईतील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स अशा ठिकाणांहून आंब्याच्या कोयी स्वतंत्ररीत्या संकलित केल्या जाणार असून, त्याच्या रोपांतून निसर्गाचे देणे निसर्गालाच परत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


नवी मुंबईकर नागरिकांनी आंबे खाऊन झाल्यानंतर उरलेल्या आंब्याच्या कोयी नेहमीच्या ओल्या कचऱ्यात टाकून न देता त्या पाण्याने धुवून स्वच्छ कराव्यात व ५ जून रोजी नवी मुंबई महापालिकेने स्वतंत्र संकलनाची व्यवस्था केलेल्या वाहनात द्याव्यात, असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, यांनी जनतेला आवाहन केले आहे.


या माध्यमातून ओला, सुका व घरगुती, घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण होणाऱ्या कचऱ्यामधील आंब्याच्या कोयींचे स्वतंत्र वर्गीकरण होऊन त्याचा उपयोग पर्यावरण संवर्धनासाठीही होणार आहे.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील