मुंबई : वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये (Keral) मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्याने आता मुंबईकर देखील मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून दोन दिवस आधीच पोहोचल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असल्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे. सामान्यत: हा प्रवास पूर्ण करण्यासाठी १० दिवस लागतात. मात्र वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार असल्याच हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने यापूर्वी ३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु चक्रीवादळ रेमलमुळे (Remal Cyclone) मान्सून वेगाने पुढे गेला आहे आणि केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागात वेळेपूर्वी पोहोचला आहे.
‘मान्सूनचा पॅटर्न कधीच सारखा नसतो’, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर पर्यावरणीय परिस्थितीनुसार मान्सूनचा पॅटर्न बदलत राहतो. ज्याप्रमाणे केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. तर यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला आहे.
दरम्यान, येत्या दोन तीन दिवसांत दक्षिण-पश्चिम मान्सूनचा आणखी विस्तार होण्यास अनुकूल परिस्थिती असल्यामुळे खाली दिलेल्या भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…