उष्णतेचा कहर! मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवरील होमगार्डच्या ६ जवानांसह ९ जणांचा मृत्यू

लखनऊ: उत्तर प्रदेशात उष्णतेचा कहर वाढतच चालला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे मिर्झापूरमध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिर्झापूरमधील उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. येथे हीट स्ट्रोकमुळे निवडणूक ड्युटीवर गेलेल्या ६ होमगार्डच्या जवानांसह ९ लोकांचा मृत्यू झाल आहे. यात मरणाऱ्यांची संख्या एक लिपिक आणि एक सफाई कर्मचाऱ्यांसह आणखी एकाचा समावेश आहे.


याची सूचना मिळताच जिल्हा निर्वाचन अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी ट्रामा सेंटरमध्ये पोहोचले. निवडणूक ड्युटीवरून आलेल्या एकूण २३ जवानांना मंडलीय चिकित्सालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यात २० होमगार्ड, एक फायर, एक पीसी आणि एका पोलीस जवानाचा समावेश आहे. या सर्वांची स्थिती बिघडल्याने ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.


मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. आर बी कमल यांनी याबाबत सांगितले की आमच्याकडे एकूण २३ जवान आले. यात एक पीसीचे आहेत. एक फायर सर्व्हिस आणि एक पोलीस आहेत. बाकी २० होमगार्ड होते. ६ होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला आहे. दोन जवान गंभीर अवस्थेत आहेत. या जवानांना खूप ताप होता.

Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात