Vatpournima 2024 : वट पौर्णिमेच्या दिवशी करा हे ३ उपाय, वैवाहिक जीवन होईल आनंदी

मुंबई: या वर्षी वटपोर्णिमेचे व्रत २० जूनला येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केली जाते. वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. ज्या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपाय करून आपले दाम्पत्य जीवन अधिक सुखी करू शकतात. यासोबतच त्यांच्या पतींचे आयुष्यही वाढू शकते.



करा हे सोपे उपाय


वटसावित्रीच्या दिवशी देव वृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पुजा करा. वटवृक्षाला ७ अथवा ११ फेऱ्या घालून इतर सूत लपेटून ठेवा.


यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा. वट सावित्री व्रताची कथा ऐका. यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करा. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमचा जीवनसाथी सुरक्षित आणि दीर्घायु राहो.


जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पुजा करा. या ठिकाणी तुपाचा दिवा लावा. नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला ११ फेऱ्या घाला. लक्ष्मी नारायणाच्या आशिर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.


जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा करा. लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या ११ कवड्या चढवा.

Comments
Add Comment

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क