Vatpournima 2024 : वट पौर्णिमेच्या दिवशी करा हे ३ उपाय, वैवाहिक जीवन होईल आनंदी

  109

मुंबई: या वर्षी वटपोर्णिमेचे व्रत २० जूनला येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केली जाते. वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. ज्या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपाय करून आपले दाम्पत्य जीवन अधिक सुखी करू शकतात. यासोबतच त्यांच्या पतींचे आयुष्यही वाढू शकते.



करा हे सोपे उपाय


वटसावित्रीच्या दिवशी देव वृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पुजा करा. वटवृक्षाला ७ अथवा ११ फेऱ्या घालून इतर सूत लपेटून ठेवा.


यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा. वट सावित्री व्रताची कथा ऐका. यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करा. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमचा जीवनसाथी सुरक्षित आणि दीर्घायु राहो.


जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पुजा करा. या ठिकाणी तुपाचा दिवा लावा. नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला ११ फेऱ्या घाला. लक्ष्मी नारायणाच्या आशिर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.


जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा करा. लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या ११ कवड्या चढवा.

Comments
Add Comment

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन