Nagpur crime : नागपुरात महिलेला उडवणाऱ्या कारचालकाची केवळ नोटीस देऊन सुटका!

Share

नियमाप्रमाणे कारवाई केल्याचा नागपूर पोलिसांचा दावा

नागपूर : पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांना चिरडल्याचे प्रकरण (Pune Car Accident) अवघ्या राज्याने उचलून धरलं आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापत असताना राज्याच्या इतर भागांतून देखील ‘हिट अॅण्ड रन’च्या (Hit and run) घटना सातत्याने समोर येत आहेत. पुणे अपघात प्रकरणात बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याबाबत सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. त्याच दरम्यान आता नागपुरातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. नागपुरात एक महिला मॉर्निंग वॉकला गेली असता एका कारचालकाने तिला उडवले आणि तो पळून गेला (Nagpur crime). या कारचालकाचा पोलिसांना २३ दिवसांनी शोध लागला, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याला केवळ नोटीस देऊन सोडलं आहे. तर महिलेची अवस्था सध्या गंभीर असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घडलेल्या घटनेनुसार, नागपुरात ७ मे रोजी ममता आदमने या ४५ वर्षीय महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मात्र, त्याच दरम्यान एका भरधाव गाडीने त्यांना मागून उडवले. त्यांची मदत न करता तो कारचालक तिथून पळून गेला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या शरीराची अनेक हाडे मोडली. शर्थीचे प्रयत्न करून, अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. मात्र, अजूनही तीन महिने त्यांना अंथरुणावर राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे, अपघाताच्या तीन आठवड्यांनंतरही नागपूर पोलीस संबंधित कार आणि दोषी कारचालकाचा शोध लावण्यात यशस्वी ठरले नव्हते.

अखेर हा आरोपी कारचालक २३ दिवसांनी हाती लागल्यानंतर पोलिसांनी त्याला केवळ नोटीस बजावून त्याची सुटका केली आहे. या अपघातात नियमाप्रमाणे कारवाई केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. कायद्यात असलेली प्रक्रिया पूर्ण करून दोषी कारचालकाला नोटीस देऊन सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ममता आदमने मात्र अंथरुणाला खिळून

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांना टप्प्याटप्प्याने दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीराची अनेक हाडे या अपघातात तुटली. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवला, मात्र प्रचंड वेदनेत ममता आदमने सध्याही अंथरुणाला खिळून आहेत. डॉक्टरांच्या मते पुढील तीन महिने त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकणार नाहीत आणि चालूही शकणार नाहीत. पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांना अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

27 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago