मुंबई: भारतासह जगभरात डायबिटीज हा आजार सामान्य होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा आजार सायलेंट किलरसारखा आहे जो शरीराला आतून संपवतो. एकदा याच्या विळख्यात एखादा व्यक्ती सापडला तर आयुष्यभर त्याला हा आजार सोडत नाही.
तुम्हालाही जर डायबिटीज असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलेले बरे. काही असे खाद्यपदार्थ असे आहेत ज्याच्यापासून तुम्ही दूर राहून तुमची साखर नाही वाढणार.
डायबिटीजच्या लोकांसाठी साखर अतिशय धोकादायक आहे. जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर तुम्हाला साखर आणि साखरेपासून बनलेल्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मिठाई, केक, पेस्ट्री, शुगर ड्रिंक आणि इतर गोड पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी मैदा आणि रिफाईंड पीठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. समोसे, सफेद भात, ब्रेड, पास्ता, पिझ्झा हे पदार्थ खाऊ नयेत.
सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात शुगर आणि कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. द्राक्षे, संत्री, आंबा या फळांच्या रसातही शुगर असते.
याशिवाय बटाटा, मैदा, साखरपासून बनवलेल्या ब्रेडमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असते. गोड दलिया, नॉन डेअरी मिल्क, राईस मिल्क, बदामाचे दूध आणि एनर्जी बार, रताळे यांच्या सेवनानेही ब्लड शुगर वेगाने वाढते.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…