Health: डायबिटीज आहे? या ४ पदार्थांपासून राहा दूर, नाही वाढणार साखर

  70

मुंबई: भारतासह जगभरात डायबिटीज हा आजार सामान्य होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा आजार सायलेंट किलरसारखा आहे जो शरीराला आतून संपवतो. एकदा याच्या विळख्यात एखादा व्यक्ती सापडला तर आयुष्यभर त्याला हा आजार सोडत नाही.

तुम्हालाही जर डायबिटीज असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलेले बरे. काही असे खाद्यपदार्थ असे आहेत ज्याच्यापासून तुम्ही दूर राहून तुमची साखर नाही वाढणार.

गोड पदार्थांपासून राहा लांब


डायबिटीजच्या लोकांसाठी साखर अतिशय धोकादायक आहे. जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर तुम्हाला साखर आणि साखरेपासून बनलेल्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मिठाई, केक, पेस्ट्री, शुगर ड्रिंक आणि इतर गोड पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.

मैद्यापासून बनवलेले पदार्थ ठरतात धोकादायक


डायबिटीज असलेल्या रुग्णांनी मैदा आणि रिफाईंड पीठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. समोसे, सफेद भात, ब्रेड, पास्ता, पिझ्झा हे पदार्थ खाऊ नयेत.

सॉफ्ट ड्रिंक्सचे मर्यादित सेवन


सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात शुगर आणि कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. द्राक्षे, संत्री, आंबा या फळांच्या रसातही शुगर असते.

तेलकट पदार्थांपासून राहा दूर


याशिवाय बटाटा, मैदा, साखरपासून बनवलेल्या ब्रेडमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असते. गोड दलिया, नॉन डेअरी मिल्क, राईस मिल्क, बदामाचे दूध आणि एनर्जी बार, रताळे यांच्या सेवनानेही ब्लड शुगर वेगाने वाढते.
Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर