सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा...

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग ॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥ परनिंदा टाळावी । स्वत:कडे दृष्टि वळवावी ॥ गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥ जेथे जेथे जावे । चटका लावूनच यावे ॥ याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥ देहाचे दु:ख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥ अभिमान नसावा तिळभरी। निर्भय असावे अंतरी ॥ जे दु:ख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥ देह टाकावा प्रारब्धावर। आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥ मी असावे रामाचे । याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥ प्रपंचातील सुखदु:ख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावे रघुनाथा ॥ आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥ दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥ कोणास न लावावा धक्‍का । हाच नेम तुम्ही राखा ॥ एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्भाव धरी ॥


राम ज्याचा धनी । त्याने न व्हावे दैन्यवाणी ॥ नका मागू कुणा काही । भाव मात्र ठेवा रामापायी ॥ वाईटांतून साधावे आपले हित । हे ठेवावे मनी निश्चित ॥ भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण॥ म्हणून भक्ति व नाम । याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान ॥ परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण । त्यातच त्यास पाहावे आपण ॥ सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती । खऱ्या विचारांची जोडेल संगति । व्यवहारातील लाभ आणि हानि । मनापासून आपण न मानी ॥ मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी ॥ सुखाने वर्तत जावे जनी ॥ एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा ॥ रामाविण उठे जी जी वृत्ति । त्यासी आपण न व्हावे सांगाती ॥ मी रामाचा हे जाणून । वृत्ति ठेवावी समाधान ॥ धन्य मी झालो । रामाचा होऊन राहिलो । ही बनवावी वृत्ति । जेणे संतोषेल रघुपति ॥ वृत्ति बनविण्याचे साधन । राखावे परमात्म्याचे अनुसंधान ॥ शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति तशी नाही बनली ॥ विषयाधीन जरी होय वृत्ति। तरी दुरावेल तो रघुपति ॥ संतांची जेथे वस्ती । तेथे आपली ठेवावी वृत्ति ॥ सतत विवेक अखंड चित्ती। रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परम प्राप्ति ॥ नामामध्ये ऐसी सत्ता । जेणे जोडे रघुनाथा ॥ नामापरते न मानावे हित । हेच आजवर सांगत आलो सत्य ॥ भगवंताला आपले होणे आवडते फार । श्रीरामनामी राहावे खबरदार॥


तात्पर्य : रघुनाथस्मरणात असावे आनंदात । तेथे न चाले कोणाची मात॥

Comments
Add Comment

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

पितृऋण

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे हिंदू धर्माने सांगितलेली चार ऋणे म्हणजेच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण.

विश्वामित्र

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विश्वामित्रांच्या चरित्राला किंबहुना सर्वच ऋषीवरांच्या चरित्राला असलेल्या