Bihar Heat Alert : वाढत्या उष्णतेचा हाहाकार! उष्माघाताने घेतला १६ जणांचा जीव

  65

हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा


बिहार : देशभरात उन्हाचा कडाका वाढत चालल्याचे चित्र आहे. केरळमध्ये (Keral) मान्सूनचे (Monsoon) नुकतेच आगमन झाले असले तरीही इतर राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दिल्लीनंतर (Delhi) बिहारमध्ये (Bihar) उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) सर्व विक्रम मोडले आहेत. बिहारमध्ये वाढत्या उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बिहार सरकार आणि हवामान विभागाकडून (IMD) अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



उष्मघाताने २४ तासांत १६ जणांचा मृत्यू


बिहारमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ३३७ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. तर २४ तासांमध्ये १६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.



'या' भागात उष्णतेचा अलर्ट


वाढते तापमान लक्षात घेता बिहार सरकार आणि हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-मध्य भागात एक-दोन ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर राज्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भागात एक-दोन ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या नैऋत्य-पश्चिम पाटणामध्ये एक-दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



'इतका' असेल तापमानाचा पारा


बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.


दरम्यान, वाढते तापमान लक्षात घेता बिहारमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३० मे ते ८ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी