प्रचार संपताच पंतप्रधान मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल

  87

कन्याकुमारी (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल येथे १ जूनपर्यंत ध्यानधारणा करण्यासाठी दाखल झाले आहेत. विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रथम शहरातील भगवती अम्मान मंदिरात पूजा केली. स्वामी विवेकानंद यांना 'भारतमाते'विषयी दिव्य दर्शन झाले होते, असे मानले जाणारे ध्यानमंडपम येथे मोदी गुरुवारी सायंकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान धारणा करतील. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून त्यांच्या मुक्कामादरम्यान २००० पोलीस तैनात राहणार असून, भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाचाही चोख बंदोबस्त असणार आहे.


गुरुवार ते शनिवार या कालावधीत हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींना नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले. येथे त्यांनी भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन आणि पूजा केली. तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा पुतळाही ते पाहतील. पंतप्रधान मोदी १ जूनच्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होऊ शकतात.


निवडणुकांची घोषणा झाल्यापासून नरेंद्र मोदींनी प्रचारसभा, रॅली, रोड शोंचा धडाका लावली होता. बिहारच्या जुमई येथून मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. गेल्या ७५ दिवसांत मोदींनी २०० पेक्षा जास्त रॅली, सभा आणि रोड शोमधून जनतेला संबोधित केले आणि विविध न्यूज चॅनेल्सला मिळून ८० मुलाखती केल्या आहेत. निवडणुकांच्या घोषणेपूर्वी मोदींनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १५ रॅली केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या आहेत. नरेंद्र मोदींनी पंजाबच्या होशियारपूरमधून आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. त्यानंतर, पुढील दोन दिवस ध्यान साधना करण्यासाठी पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला रवाना झाले.

Comments
Add Comment

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

मोठी बातमी : राजस्थानच्या चुरुमध्ये वायूसेनेचं विमान कोसळलं; २ मृतदेह आढळल्याची माहिती

चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त

राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे