Satbara : आता सातबारावर दिसणार आईचे नाव!

पुणे : शाळेच्या दाखल्यासह विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) याआधीच घेतला आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. सातबारा (Satbara) उताऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आता त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून (Land Record Department) घेण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात भूमी अभिलेख विभागामार्फत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.



सहा महिन्यांत होणार अंमलबजावणी


दरम्यान, सातबारा उताऱ्यात आईच्या नावासाठी नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. त्यासोबत आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तसेच तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल असे सांगण्यात आले आहे.



विवाह आधीच्या नावानेही होईल नोंदणी


सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi Service : महाराष्ट्रात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा, 'या' शहरात सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच अॅप आधारित

संतापजनक! अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् सलग १० महिने अत्याचार; महाविद्यालयीन तरुणीची तक्रार, चार आरोपी अटकेत

कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यात एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या कथित लैंगिक (Molest) अत्याचाराच्या

Farmers Loan Waiver Maharashtra : महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, पण 'या' पदाधिकाऱ्यांना मिळणार नाही लाभ

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण

Cabinet Decision: शेतकरी कर्जमाफीचे निकष जाहीर

दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान देणार मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क