राजस्थान-हरियाणामध्ये प्रचंड उकाडा, या शहरांमध्ये तापमानाचा पारा ५० अंश पार

मुंबई: उत्तर आणि मध्य भारतातील मोठा भाग भीषण उन्हाच्या तडाख्यात आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरयाणाच्या सिरसामध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा या मोसमात सामन्यपेक्षा नऊ अंश सेल्सियसनी अधिक आहे. दिल्लीमध्ये कमीत कमीत तीन हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९ डिग्रीहून अधिक दाखल झाले आहे.


राजस्थानच्या चुरू भागात सर्वाधिक तापमान आहे. येथे कमाल तापमान ५०.५ डिग्री सेल्सियस इतके दाखल झाले. यानंतर हरयाणाच्या सिरसा-एडब्लूएसमध्ये ५०.३ डिग्री, दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेलामध्ये ४९.९ डिग्री, नजफगडमध्ये ४९.८ डिग्री, राजस्थानच्या गंगानरगमध्ये ४९.४ डिग्री, राजस्थानच्या पिलानी आणि फलोदी आणि उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये ४९ डिग्री अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.



हरयाणामध्ये शाळेची सुट्टी वाढवली


भीषण उन्हामुळे हरयाणा सरकारने सरकारी आणि खासगी शाळांतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मंगळवारपर्यंत वाढ केली आहे. उन्हामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तसेच विजेची कमतरता निर्माण होत आहे.



डोंगराळ भागातही सूर्य ओकतोय आग


जम्मूध्ये पुढील सात दिवस भीषण उकाडा असणार आहे. जम्मूध्ये सोमवारी कमाल तापमान ४३ डिग्री नोंदवले गेले. तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह