राजस्थान-हरियाणामध्ये प्रचंड उकाडा, या शहरांमध्ये तापमानाचा पारा ५० अंश पार

मुंबई: उत्तर आणि मध्य भारतातील मोठा भाग भीषण उन्हाच्या तडाख्यात आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरयाणाच्या सिरसामध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा या मोसमात सामन्यपेक्षा नऊ अंश सेल्सियसनी अधिक आहे. दिल्लीमध्ये कमीत कमीत तीन हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९ डिग्रीहून अधिक दाखल झाले आहे.


राजस्थानच्या चुरू भागात सर्वाधिक तापमान आहे. येथे कमाल तापमान ५०.५ डिग्री सेल्सियस इतके दाखल झाले. यानंतर हरयाणाच्या सिरसा-एडब्लूएसमध्ये ५०.३ डिग्री, दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेलामध्ये ४९.९ डिग्री, नजफगडमध्ये ४९.८ डिग्री, राजस्थानच्या गंगानरगमध्ये ४९.४ डिग्री, राजस्थानच्या पिलानी आणि फलोदी आणि उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये ४९ डिग्री अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.



हरयाणामध्ये शाळेची सुट्टी वाढवली


भीषण उन्हामुळे हरयाणा सरकारने सरकारी आणि खासगी शाळांतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मंगळवारपर्यंत वाढ केली आहे. उन्हामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तसेच विजेची कमतरता निर्माण होत आहे.



डोंगराळ भागातही सूर्य ओकतोय आग


जम्मूध्ये पुढील सात दिवस भीषण उकाडा असणार आहे. जम्मूध्ये सोमवारी कमाल तापमान ४३ डिग्री नोंदवले गेले. तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था