राजस्थान-हरियाणामध्ये प्रचंड उकाडा, या शहरांमध्ये तापमानाचा पारा ५० अंश पार

  68

मुंबई: उत्तर आणि मध्य भारतातील मोठा भाग भीषण उन्हाच्या तडाख्यात आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरयाणाच्या सिरसामध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा या मोसमात सामन्यपेक्षा नऊ अंश सेल्सियसनी अधिक आहे. दिल्लीमध्ये कमीत कमीत तीन हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९ डिग्रीहून अधिक दाखल झाले आहे.


राजस्थानच्या चुरू भागात सर्वाधिक तापमान आहे. येथे कमाल तापमान ५०.५ डिग्री सेल्सियस इतके दाखल झाले. यानंतर हरयाणाच्या सिरसा-एडब्लूएसमध्ये ५०.३ डिग्री, दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेलामध्ये ४९.९ डिग्री, नजफगडमध्ये ४९.८ डिग्री, राजस्थानच्या गंगानरगमध्ये ४९.४ डिग्री, राजस्थानच्या पिलानी आणि फलोदी आणि उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये ४९ डिग्री अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.



हरयाणामध्ये शाळेची सुट्टी वाढवली


भीषण उन्हामुळे हरयाणा सरकारने सरकारी आणि खासगी शाळांतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मंगळवारपर्यंत वाढ केली आहे. उन्हामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तसेच विजेची कमतरता निर्माण होत आहे.



डोंगराळ भागातही सूर्य ओकतोय आग


जम्मूध्ये पुढील सात दिवस भीषण उकाडा असणार आहे. जम्मूध्ये सोमवारी कमाल तापमान ४३ डिग्री नोंदवले गेले. तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके