राजस्थान-हरियाणामध्ये प्रचंड उकाडा, या शहरांमध्ये तापमानाचा पारा ५० अंश पार

मुंबई: उत्तर आणि मध्य भारतातील मोठा भाग भीषण उन्हाच्या तडाख्यात आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरयाणाच्या सिरसामध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा या मोसमात सामन्यपेक्षा नऊ अंश सेल्सियसनी अधिक आहे. दिल्लीमध्ये कमीत कमीत तीन हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९ डिग्रीहून अधिक दाखल झाले आहे.


राजस्थानच्या चुरू भागात सर्वाधिक तापमान आहे. येथे कमाल तापमान ५०.५ डिग्री सेल्सियस इतके दाखल झाले. यानंतर हरयाणाच्या सिरसा-एडब्लूएसमध्ये ५०.३ डिग्री, दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेलामध्ये ४९.९ डिग्री, नजफगडमध्ये ४९.८ डिग्री, राजस्थानच्या गंगानरगमध्ये ४९.४ डिग्री, राजस्थानच्या पिलानी आणि फलोदी आणि उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये ४९ डिग्री अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.



हरयाणामध्ये शाळेची सुट्टी वाढवली


भीषण उन्हामुळे हरयाणा सरकारने सरकारी आणि खासगी शाळांतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मंगळवारपर्यंत वाढ केली आहे. उन्हामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तसेच विजेची कमतरता निर्माण होत आहे.



डोंगराळ भागातही सूर्य ओकतोय आग


जम्मूध्ये पुढील सात दिवस भीषण उकाडा असणार आहे. जम्मूध्ये सोमवारी कमाल तापमान ४३ डिग्री नोंदवले गेले. तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली