Crime : हत्याकांड! कुटुंब प्रमुखानेच घेतला ८ जणांचा जीव

Share

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

भोपाळ : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडा जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. कुटुंब प्रमुखाने स्वत:च्याच घरातील आठ जणांची घृणास्पद हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने आत्महत्या केल्याने या हत्याकांडाचे कारण शोधणे पोलिसांना अवघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील छिंदवाडातील महुलझीरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी हा आपल्या सर्व कुटुंबासह माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत बोदल कचर या गावात राहत होता. मद्यधुंद असताना या आरोपीने स्वत:च्या पत्नीसह घरातील इतर कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निघृण हत्या केली. त्यानंतर एका १० वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. मात्र ती पळून गेल्याने तिचा जीव वाचला आणि संबंधित माहिती परिसरातील व्यक्तींना दिली.

मानसिकरित्या आजारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या आजारी असून त्याचे नुकतेच २१ मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसात त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. काल रात्री आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये भयंकर वाद सुरु होता. त्या वादादरम्यान आरोपीने आठ जणांची निघृण हत्या करुन स्वत:हा आत्महत्या केली. मृतांमध्ये आरोपीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत आई, वडील, बहिण, भाऊ, वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची निघृण हत्या केली.

दरम्यान, हत्याकांडानंतर संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र पोलिसांना हत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनास्थळी भेट देत निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

54 mins ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

2 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

2 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

2 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

3 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

4 hours ago