Crime : हत्याकांड! कुटुंब प्रमुखानेच घेतला ८ जणांचा जीव

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय


भोपाळ : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडा जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. कुटुंब प्रमुखाने स्वत:च्याच घरातील आठ जणांची घृणास्पद हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने आत्महत्या केल्याने या हत्याकांडाचे कारण शोधणे पोलिसांना अवघड झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील छिंदवाडातील महुलझीरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी हा आपल्या सर्व कुटुंबासह माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत बोदल कचर या गावात राहत होता. मद्यधुंद असताना या आरोपीने स्वत:च्या पत्नीसह घरातील इतर कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निघृण हत्या केली. त्यानंतर एका १० वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. मात्र ती पळून गेल्याने तिचा जीव वाचला आणि संबंधित माहिती परिसरातील व्यक्तींना दिली.



मानसिकरित्या आजारी


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या आजारी असून त्याचे नुकतेच २१ मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसात त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. काल रात्री आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये भयंकर वाद सुरु होता. त्या वादादरम्यान आरोपीने आठ जणांची निघृण हत्या करुन स्वत:हा आत्महत्या केली. मृतांमध्ये आरोपीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत आई, वडील, बहिण, भाऊ, वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची निघृण हत्या केली.


दरम्यान, हत्याकांडानंतर संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र पोलिसांना हत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनास्थळी भेट देत निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते